लोकसत्ता टीम

वाशीम: जिल्ह्यात गत काही दिवसापासून अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. २५ एप्रिल रोजी कारंजा व मानोरा तालुक्यात झालेल्या गारपिटीमुळे टोमॅटो, आंबा आणि उन्हाळी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यापूर्वीही झालेल्या गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तातडीने पंचनामे करण्यात येत आहेत. मात्र, गारपिटीने अनेक शेतकरी उध्वस्त होत असून जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड अजूनही जिल्ह्यात फिरकलेच नसल्याने शेतकऱ्यात प्रचंड रोष व्यक्त होत आहे.

Local representatives upset over the interference of MLAs in Nagpur in the planning of iron ore and other minor mineral funds
गडचिरोली जिल्हा खनिज निधीवर नागपुरातील आमदारांचा डोळा?; जिल्हाबाहेरील कंत्राटदारांची रेलचेल वाढली
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
Illegal stock of Khair seized in Nandurbar district
नंदुरबार जिल्ह्यात खैराचा अवैध साठा जप्त; गुप्तपणे करण्यात आली कारवाई
Washim water issue, Nitin Gadkari letter,
नितीन गडकरींचे देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा पत्र; जाणून घ्या नेमका विषय काय?
kolhapur mahayuti marathi news
कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीची साथ सोडून सहकारातील बडे नेते पुन्हा महाविकास आघाडीत
BJP MLA Dr. Sandeep Dhurve dance with famous dancer Gautami Patil video goes viral
Video : गौतमी पाटीलसोबत आमदार संदीप धुर्वे थिरकले; जिल्ह्यात पूरस्थिती अन्…
Solapur, fake doctors, municipal administration, Tukaram Mundhe, Maharashtra Medical Practitioners Act, fake doctors in Solapur, Solapur news, latest new
सोलापुरात तोतया डॉक्टरवर महापालिका प्रशासनाची कारवाई, जिल्ह्यात २५० तोतया डॉक्टर असण्याचा अंदाज
live worms found in chocolate distributed to students in rajura taluka
चॉकलेटमध्ये जिवंत अळ्या, सोंडे; ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती’अंतर्गत विद्यार्थांना वाटप

जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात वरोली, चिखली, कारखेडा,जामदारा, घोटी तर कारंजा तालुक्यातील पिंपरी फॉरेस्ट सह मालेगाव तालुक्यातील काही भागात २५ एप्रिल रोजी जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे टमाटो, आंबा, ज्वारी, बाजरी, मूंग तसेच उन्हाळी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. यापूर्वी देखील जिल्ह्यात झालेल्या गारपिटीमुळे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यात आले आहे.

हेही वाचा… बुलढाणा: गाढ झोपेची किंमत साडेतीन लाख; नांदुऱ्यातील गुरुजींना दे धक्का

सध्याही पंचनामे केले जात आहेत. मात्र, तात्काळ पीक नुकसान भरपाई मिळत नाही आहे. एकीकडे सरकार शेतकऱ्यांचे असल्याची वल्गणा केली जात आहे. मात्र, जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडलेला असताना जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले संजय राठोड यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होत आहे.