वाशीम : जगाचा पोशिंदा म्हणून शेतकरी ओळखला जातो. मात्र सध्या शेतकरी वेग वेगळ्या अडचणीचा सामना करीत आहे. एकीकडे दुष्काळाचे सावट तर दुसरीकडे खाबुगिरीचा प्रचंड मनःस्ताप शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. मात्र, वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अडवणूक करून पैश्याची मागणी करणाऱ्या एका लाईनमनला शेतकऱ्याने चांगलाच शॉक दिला.

रिसोड तालुक्यातील एका शेतकऱ्याने शेतात डीपी घेतली.मात्र लाईनमन शेतकऱ्याला वीज जोडणी केल्याचा मोबदला मागून अडवणूक करू लागला. आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्याने ही बाब लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगून फिर्याद दिली. यावरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून तक्रारदार यांचे कडून पंचासमक्ष एक हजार रुपये घेताना लाईनमन याला रंगेहाथ पकडण्यात आल्याची घटना ७ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. या प्रकरणी कुणाल मोहन सिंग छार या लाईनमन विरोधात रिसोड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Bogus crop insurance of Rs 65 crore taken in Parbhani MP Sanjay Jadhav demands registration of case
परभणीत ६५ कोटीचा बोगस पीक विमा उचलला, गुन्हा दाखल करण्याची खासदार जाधव यांची मागणी
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Effects of climate change on agriculture Global warming Cyclone
शेतकऱ्याच्या अनुभवांचे बोल मोलाचे!
Shetkari sangharsh samiti demands cancellation of Pune-Nashik Industrial Expressway pune
पुणे- नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग रद्द करावा; शेतकरी संघर्ष समितीची मागणी
Success story of Dr kamini singh left government job for moringa business now earning near 2 crore
सरकारी नोकरी सोडली अन् धरली ‘ही’ वाट, आता करतात कोटींची कमाई; नेमकं काय करते ‘ही’ व्यक्ती
low prices of tur in market
विश्लेषण : बाजारपेठेत तुरीच्या घसरणीमुळे शेतकऱ्यांशी कोंडी कशी?
banana marathi news
लोकशिवार : केळी पिकाला रोगांचा विळखा
Gondia district Latur Cooperative Minister Babasaheb Patil guardian minister
लातुरातून चालणार गोंदिया जिल्ह्याचा कारभार; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे जिल्ह्याचे पालकत्व

हेही वाचा : नागपूरकरांनो लक्ष द्या… उद्या ‘या’ वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा नाही

ही कारवाई पोलीस उप अधीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजित कांबळे, पोहवा असिफ शेख, योगेश खोटे, राहुल व्यवहारे, रवींद्र घरद, चालक नावेद शेख आदींनी केली. सध्या खरीप हंगामाची लगबग सुरु असून अपुऱ्या पावसामुळे पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची मदार विजेवर अवलंबून आहे. मात्र पावलो पावली शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याचे दिसून येत असल्याने शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

Story img Loader