वाशीम : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या मतदानानंतर काही दिवसांनी मतदान टक्केवारीत झालेली वाढ तसेच मतदानाच्या दिवशी झालेला गैरप्रकार आणि समाज माध्यमांवर प्रसारित केले जाणारे मतदानाचे अंदाज यावरून मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून समनक जनता पार्टीने यावर आक्षेप घेतला आहे. याबाबत जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदान प्रक्रियेत ५.८७ टक्के मतदान वाढीच्या अंदाजाचे वृत्त विविध वृत्तपत्रांमधून प्रकाशित झाले होते. मतदान झाल्यानंतर काही दिवसांनी मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ दर्शवण्यात आली. ही वाढ कशी काय होऊ शकते, असा प्रश्न तक्रारीतून करण्यात आला आहे.

हेही वाचा : मातृदिनीच माऊलीवर कोसळला दुःखाचा डोंगर…तीन वर्षीय चिमुकल्याचा डोळयासमोर…

Administrative approval for road works affected by heavy rain Funding in Vikramgarh Assembly Constituency Palghar
पालघर: पाऊस सर्वत्र मात्र अतिवृष्टी विक्रमगड विधानसभा क्षेत्रातच !
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Factory activity at three-month low Production PMI Index at 57.5 points in August
कारखानदारीचा वेग तीन महिन्यांच्या नीचांकाला, निर्मिती ‘पीएमआय निर्देशांक’ ऑगस्टमध्ये ५७.५ गुणांवर
MPSC, civil services, joint preliminary examination, Maharashtra Public Service Commission, 25 august, agricultural service,
‘एमपीएससी’ : कृषी सेवा परिक्षेबाबत मोठी बातमी; अधिकाऱ्यांनी सांगितले की…
icra predict growth rate to slow to 6 percent in the first quarter in
पहिल्या तिमाहीत विकास दराच्या ६ टक्क्यांच्या नीचांकांचा ‘इक्रा’चा अंदाज
japan flights cancel
‘या’ देशात एक कात्री गायब झाल्याने ३० हून अधिक उड्डाणे रद्द; नेमकं प्रकरण काय?
Krushi Sevak, Krushi Sevak posts,
मोठी बातमी! २५ ऑगस्टच्या परीक्षेत कृषी सेवकांचा २५८ पदांच्या समावेशासंदर्भात महत्त्वाचा….
The Central Election Commission ordered the state government to transfer the officers of Revenue Police Excise Municipalities Corporations politics
तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, निवडणूक आयोगाचे आदेश; मंगळवारपर्यंत मुदत

मतदानाच्या दिवशी २६ एप्रिल रोजी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात कळंब चौक येथील अंजुमन शाळेच्या मागील भागात बोटाला शाही लावून पैसे वाटत असल्यावरून दोन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हे सर्व प्रकार पाहता मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मतदारांची दिशाभूल करणारा विजयी उमेदवारांबाबतचा अंदाज समाज माध्यमांवर प्रसारित केला जात आहे. या अंदाजाला कुठल्याही प्रकारचे ठोस पुरावे तसेच आधार नाही. मग उमेदवाराच्या विजयाचे भाकीत कसे काय वर्तवले जाऊ शकते, असा प्रश्न उपस्थित करीत समनक जनता पार्टीने यावर आक्षेप घेतला असून वेळप्रसंगी न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही दिला आहे.