लोकसत्ता टीम

यवतमाळ: लग्नसराई आणि उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे बसस्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाल्याने चोरांचे फावत आहे. बुधवारी सायंकाळी चोरट्यांनी लग्नात नवरी मुलीस देण्यासाठी आणलेले तीन लाखांचे दागिने लंपास केल्याने खळबळ उडाली. मंगळवारी येथूनच एका महिलेचे ६२ हजारांचे दागिने पळवले होते. बसस्थानकरावरील चोरींच्या घटनांना पोलीस गांभीर्याने घेत नसल्याने चोरट्यांचे मनोबल वाढल्याची ओरड प्रवाशांमधून होत आहे.

Fraud, cheap house, government quota,
सरकारी कोट्यातून स्वस्त दरात घरे देण्याच्या नावाखाली सुमारे २५ कोटींची फसवणूक, पुरुषोत्तम चव्हाणसह इतर आरोपीविरोधात गुन्हा
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Bus Passenger Thrashes Conductor After argument over change money
नागपूर : सुट्या पैशांवरून बाचाबाची; एसटी बसच्या वाहकाला मारहाण…
Bogus crop insurance of Rs 65 crore taken in Parbhani MP Sanjay Jadhav demands registration of case
परभणीत ६५ कोटीचा बोगस पीक विमा उचलला, गुन्हा दाखल करण्याची खासदार जाधव यांची मागणी
corruption, ST , Nana Patole,
जनतेला लुटण्यापेक्षा एसटी महामंडळातील भ्रष्टाचार थांबवा – नाना पटोले
debt collectors false case news in marathi
जबरी चोरीचा बनाव करणाऱ्या कर्मचाऱ्याला बेड्या
Explosion at an ordnance manufacturing factory in Jawahar Nagar
भंडाऱ्यातील घटनेमुळे देशभरातील आयुध निर्माणीतील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे का?
Two wheeler theft on the rise in pune city
शहरबात : दुचाकी चोर, पोलिसांना शिरजोर!

यवतमाळचे उत्तम स्थितीतील बसस्थानक पाडून येथे ‘बसपोर्ट’ करण्यासाठी चार वर्षांपूर्वी बसस्थानक तात्पुरत्या जागेत सुरू केले. येथे सुविधांची वाणवा आहे. जागा अपुरी असल्याने प्रवाशांची कायम गर्दी असते. सध्या लग्नसराई आणि सुट्टीसोबतच महिलांना अर्धी तिकीट झाल्यापासून बसमध्ये गर्दी वाढली आहे. हीच गर्दी चोरांचे लक्ष्य ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून बसस्थानकावर चोरींच्या घटनांत लक्षणीय वाढ झाली आहे. मंगळवारी अकोला बसमध्ये चढत असलेल्या बेबी राजेंद्र चौधरी या महिला प्रवाशाची पर्स चोरट्यांनी लंपास केली. पर्समधील ६२ हजार रूपयांचे दागीने लंपास झाल्याची तक्रार त्यांनी अवधूतवाडी पोलिसांत केली.

हेही वाचा… बुलढाणा : मालमोटारीची दुचाकीला धडक; चालक ठार, दुचाकीने क्षणात पेट घेतला अन्..

या घटनेची चौकशी सुरू असताना बुधवारी सायंकाळी राजूसिंग चव्हाण (रा. अमरावती) हे पत्नीसह घाटंजी तालुक्यातील कोळी खुर्द येथे जाण्यासाठी अमवतीहून आले होते. ते बसमध्ये बसले असताना ते नवरीसाठी घेऊन जात असलेले तीन लाख रूपयांचे दागीने बॅगमधून चोरी गेल्याचे त्यांना लक्षात आले. त्यांनी तातडीने अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला.

हेही वाचा… नागपुरात पावसामुळे कच्च्या विटांची माती, २५ लाखांची हानी

तक्रारीत अज्ञात असलेले चोर सर्वांनाच ज्ञात !

यवतमाळातील एका विशिष्ट भागातील महिलांच्या टोळ्या नवीन व जुने बसस्थानक परिसरात घुटमळत असतात. महिला प्रवासी या टोळीचे टार्गेट असते. प्रवाशी बसमध्ये चढताना या टोळीतील महिला गोळा होवून बसमध्ये चढण्यासाठी गोंधळ घालून रेटारेटी करतात. या गोंधळात या टोळीतील अन्य सदस्य हातसफाई करतात. यासाठी अनेकदा लहान मुलांचाही वापर होतो. पोलिसांसह येथे वावर असलेले नागरिक, बसचे चालक, वाहक सर्वांनाच ही महिला टोळी ज्ञात आहे. मात्र प्रवाशांनी चोरीची तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यापलिकडे पोलीस ठोस कारवाई करत नाही. पोलिसांनी बसस्थानकावर प्रवशांचा चोरट्यांपासून बचाव करण्यासाठी बंदोबस्त वाढविण्याची मागणी आहे.

Story img Loader