समृध्दी महामार्ग सुरू झाला. त्याचे कौतुकही झाले. पण आता त्यावर प्रवास करतात येणाऱ्या अडचणीवर लोकं बोलू लागले आहेत. १०० किमीच्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंट नाही. पेट्रोल पंप नाही. एवढेच काय तर गाडीला अपघात झाला तर तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करुन देणारी साधने नाहीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- वेळेचीही ‘समृद्धी’! नागपूर-शिर्डी अंतर तब्बल १०२ किलोमीटरने कमी; आजपासून नागपूर-औरंगाबाद बसही धावणार

समृद्धी महामार्गावरून सामाजिक कार्यकर्ता दीपक साने यांनी प्रवास केला. त्यांना आलेले अनुभव त्यांनी समाज माध्यमातून लोकांना सांगितले. त्यांनी नागपूर पासून प्रवास सुरू केला. वाटते त्यांना कुठे हॉटेल, रेस्टॉरंट दिसले नाही. विशेष म्हणजे वाटेत पेट्रोल पंप दिसत नाही. दूर-दूर पर्यंत महिलांसाठी स्वच्छता गृह नाही. रस्त्यावर तहान लागली तर पिण्याच्या पाण्याची सोय नाही. प्रवासा दरम्यान अपघात झाल्यास इस्पितळ, रुगवाहिका नाही, रात्रीच्या वेळी वाहन धारकांना कोणी लुटले तर पोलिसांची मदत केंद्र दूरपर्यंत कुठे दिसत नाही. साने यांनी समृद्धीच्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधून तेथे वरील अडचणी मागल्या. विशेष म्हणजे ५२० किमी च्या नागपूर-शिर्डी प्रवासा दरम्यान पहिले
नियंत्रण कक्ष औरंगाबाद जिल्ह्यात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inconvenience of hotels petrol pumps and medical facilities on samrudhi highway cwb 76 dpj