यवतमाळ: जिल्ह्यात रस्ते अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून गेल्या ११ महिन्यांत तब्बल ७९७ अपघातांची नोंद झाली आहे. या अपघातांत ३८० व्यक्तींनी जीव गमावला आहे.

जिल्ह्यात अलीकडच्या काळात राष्ट्रीय, राज्य महामार्गाचे जाळे मोठ्या प्रमाणात निर्माण झाले. त्यामुळे वाहनांचा वेगही वाढला आहे. अनेकदा दुचाकी वाहनचालक वाहतूक नियम न पाळता वाहने चालवितात. त्यातून अपघातांची संख्या वाढली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ७९७ रस्ते अपघात झाले. त्यात ३८० जणांचा मृत्यू झाला तर, ४९४ जण जखमी झाल्याची नोंद जिल्हा वाहतूक शाखेकडे आहे.

4 crushed to death after sand-laden truck flips
Accident Video : रस्त्याच्या कडेला काम कारणाऱ्या कामगारांवर वाळूने भरलेला ट्रक उलटला! दोन वर्षांच्या चिमुरड्यासह चौघांचा मृत्यू
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Accident News
Road Accident : महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराजकडे निघालेल्या ८ मित्रांवर काळाचा घाला; गावात एकाच वेळी पेटल्या चीता
Image Of Accident
Road Accident Deaths : भारतात रस्ते अपघातात दररोज होतो ४६२ लोकांचा मृत्यू, धक्कादायक आकडेवारी समोर
st bus news in marathi
‘एसटी’चा प्रवास महागला, सुरक्षिततेचे काय? दोन वर्षांत ३०१ अपघात, ३५ जणांचा मृत्यू
is the police protecting reckless drivers
बेदरकार वाहनचालकांना पोलिसांचे अभय?
Nashik-Gujarat highway Accident
Nashik-Gujarat Highway Accident : नाशिक-गुजरात महामार्गावर भीषण अपघात! भाविकांनी भरलेली बस दरीत कोसळली; ७ जणांचा मृत्यू
Accident
Accident : दाट धुक्याने घात केला! १२ प्रवासी असलेली क्रूझर कार कोसळळी कालव्यात; १० जण बेपत्ता

यावर्षी जानेवारी महिन्यात ६३ अपघात झाले त्यात २५ जणांचा मृत्यू तर ४४ जण जखमी झाले. फेब्रुवारीत ८६ अपघातात ३९ जणांचा मृत्यू तर ४७ जण जखमी झाले. मार्चमध्ये ९३ अपघातात ४६ जणांचा मृत्यू, ५० जखमी, एप्रिल ८४ अपघात, ४१ मृत्यू, २७ जखमी, मे ७८ अपघात, ४१ ठार, ३६ जखमी, जून १०१ अपघात, ५२ मृत्यू तर ४० जखमी, जुलै ५१ अपघात, ३३ ठार, २२ जखमी, ऑगस्ट ७२ अपघात, २७ ठार, ४० जखमी, सप्टेंबर ६२ अपघात, ३३ ठार, ६३ जखमी, ऑक्टोबर ४३ अपघात २४ ठार, ३० जखमी तर नोव्हेंबर महिन्यात ६४ अपघातांची नोंद करण्यात आली. त्यात २७ जण ठार झाले तर ३४ जण जखमी झाले.

हेही वाचा… मुंबईतून कामकाज करणाऱ्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांची कारणे दाखवा नोटीस, कारण काय? वाचा…

चालू वर्षात जून महिन्यात सर्वाधिक १०१ अपघातांची नोंद झाली. २०२२ मध्ये वर्षभरात एक हजार २०९ अपघात झाले होते. त्यात ४१६ जणांचा मृत्यू झाला होता तर, ४०० वर व्यक्ती जखमी झाले होते. सर्वाधिक २११ अपघात यवतमाळ उपविभागात नोंदविण्यात आले आहे. या अपघातांत ९९ जणांनी जीव गमावला. पांढरकवडा उपविभागत १७९ अपघात ५६ मृत्यू, वणी १२२ अपघात ७८ मृत्यू, पुसद ८२ अपघात ३३ मृत्यू तर दारव्हा उपविभागात १६० अपघातांत ८१ जणांच मृत्यू झाल्याची नोंद वाहतूक विभागाने घेतली आहे.

दुचाकी चालकांनी हेल्मेट वापरावे, यासाठी वाहतूक शाखेकडून जनजागृतीसह दंडात्मक कारवाईदेखील करण्यात येते. मात्र, तरीही त्याकडे कानाडोळा केला जातो. अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. सिटबेल्टचा वापर केल्यास जीव वाचू शकतात, मात्र चारचाकी वाहनधाकर राष्ट्रीय महामार्गावरही सिटबेल्ट वापरत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

यवतमाळची वाहतूक विस्कळीत

यवतमाळ शहराची वाहतूक कायम विस्कळीत आहे. शहराच्या चारही बाजूंनी रस्ते फेरीवाले, भाजी विक्रेत्यांनी व्यापल्याने शहरातून वाहन चालविताना कसरत करावी लागते. त्यामुळे अनेकदा वादाचे प्रसंग निर्माण होतात. मात्र वाहतूक शाखा याकडे दुर्लक्ष करत असल्याची नागरिकांची ओरड आहे.

Story img Loader