अमरावती : देशातील कापूस उत्पादन यंदा ८ टक्क्यांनी घटणार असून उत्पादन २९५ लाख गाठींपर्यंत होईल, असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (सीएआय) वर्तवला आहे. कापसाचा वापर यंदाही कमी राहणार असला, तरी कापूस आयात जवळपास दुप्पट होऊन २२ लाख गाठींवर पोहोचेल, असे ‘सीएआय’च्या हंगामातील दुसऱ्या अहवालात म्हटले आहे.

ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या कापसाच्या नव्या हंगामात २९५ लाख कापूस उत्पादनाचा अंदाज ‘सीएआय’ने व्यक्त केला आहे. एक कापूस गाठ १७० किलो रुईची असते. मागील हंगामातील शिल्लक साठा जवळपास २९ लाख गाठींचा आहे. यंदा आयात ७६ टक्क्यांनी वाढून २२ लाख टनांची होईल. म्हणजेच यंदा एकूण कापूसपुरवठा ३४६ लाख गाठींचा असेल, असे ‘सीएआय’ने म्हटले आहे. देशातील कापूस वापर गेल्या वर्षी इतकाच म्हणजेच ३११ लाख गाठींचा होईल. कापूस निर्यात १४ लाख गाठींवर स्थिरावेल. मागील हंगामातील कापूस निर्यात १५ लाख ५० हजार गाठींची झाली होती.

shortage of three hundred to five hundred grams of food grains supplied to ration shops in Sawantwadi
सावंतवाडीमध्ये रेशन दुकानात पुरवठा करण्यात येणाऱ्या धान्यात तीनशे ते पाचशे ग्रॅम तूट
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Mumbai municipal corporation
विश्लेषण : देशातल्या सर्वांत श्रीमंत महापालिकेला घरघर? मुंबई महानगरपालिकेच्या घटलेल्या मुदतठेवी चिंतेची बाब का?
maize ethanol loksatta news
राज्यात मक्याचे क्षेत्र दुप्पटीने वाढले; जाणून घ्या, क्षेत्र वाढ का आणि किती झाली
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत महायुती सरकारने तीन लाख ७० हजार शेतकऱ्यांकडून सात लाख ८१ हजार मेट्रिक टन सोयाबीन खरेदी केली. (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Soybean Rate : महायुतीचे सोयाबीन खरेदीचे दावे, तरीही शेतकरी संकटातच; काय आहे कारण?
parbhani cotton production loksatta news
करोना काळात परभणीत वाढलेला कापूस यंदा घटला
Bogus crop insurance of Rs 65 crore taken in Parbhani MP Sanjay Jadhav demands registration of case
परभणीत ६५ कोटीचा बोगस पीक विमा उचलला, गुन्हा दाखल करण्याची खासदार जाधव यांची मागणी
Dombivli Datta Nagar Fish Market news in update in marathi
डोंबिवलीतील दत्तनगरमधील मासळी बाजारामुळे वाहतूक कोंडी; मासळी बाजाराच्या स्थलांतराची नागरिकांची मागणी

हेही वाचा >>> ‘सोलार’ स्फोटाचा संथगतीने तपास; चौकशीबाबत शासकीय यंत्रणांकडून कमालीची गुप्तता

मागील हंगामात देशात १२ लाख ५० हजार गाठी कापूस आयात झाला होता. हीच आयात यंदा २२ लाख गाठींवर पोहोचणार आहे. म्हणजेच आयातीत तब्बल ७६ टक्क्यांची वाढ होणार आहे. यापुढील काळात कापूस उत्पादनाविषयीचे चित्र स्पष्ट होईल. ‘सीएआय’ने आपल्या अंदाजात यंदा १४ लाख गाठी कापूस निर्यात होईल असे म्हटले आहे. मागील हंगामात देशातून १५ लाख ५० हजार गाठी कापूस निर्यात झाली होती.

अधिक उत्पादन कुठे?

मध्य भारतातील गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात १७५.६५ लाख गाठींचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. या तीन राज्यांत गेल्या हंगामात १९०.६७ लाख गाठींचे उत्पादन झाले होते. खराब हवामानामुळे या राज्यांत कपाशीच्या पिकावर परिणाम झाला आहे. उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये ४०.६६ लाख गाठी, दक्षिण भारतातील तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये ६५.४० लाख गाठींचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

राज्यातही तूट

‘सीएआय’च्या अहवालानुसार, महाराष्ट्रात २०२३-२४ या हंगामात ७५.१४ लाख कापूस गाठींचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. २०२२-२३ च्या हंगामात महाराष्ट्रात ७९.२५ लाख गाठींचे उत्पादन नोंदवण्यात आले आहे.

‘सीएआय’च्या ‘क्रॉप कमिटी’ने नुकतीच एक बैठक घेतली. यात देशातील विविध कापूस उत्पादक प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणारे १६ सदस्य उपस्थित होते. संघटनेच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीच्या आधारे कापूस प्रक्रियेचा अंदाज लावण्यात आला आहे. यंदा कापूस उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. – अतुल गणात्रा, अध्यक्ष, ‘सीएआय’.

Story img Loader