लोकसत्ता टीम

नागपूर: ‘इंडिया’च्या नावाखाली सर्व विरोधी पक्ष एकत्र आले असेल तरी ही आघाडी बारुंद नसलेला बॉम्ब असून ही केवळ नाटक कंपनी आहे. सगळे नेते मुंबईत हॉटेलमध्ये राहून मुंबई फिरून निघून जातील. त्यांच्याकडे कार्यक्रम आहे, ना मुद्दे, फक्त नरेंद्र मोदी विरोधात मोट बांधण्याचा देखावा करण्यासाठी ते एकत्र येत आहे,अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात केली.

Prime Minister Narendra Modi visiting Ganapati puja at the home of Chief Justice of India Dhananjay Chandrachud
‘व्यक्तिगत’ पूजा- आरतीचे जाहीर प्रदर्शन झाल्यानंतर…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
donald trump on pet animals of america (1)
खरंच अमेरिकेतील स्थलांतरित पाळीव मांजरी खातात? ट्रम्प यांनी वादविवाद सत्रात प्राण्यांचा मुद्दा का उपस्थित केला? नेमकं प्रकरण काय?
Kamala Harris, presidential debate,
विश्लेषण : अध्यक्षीय डिबेटमध्ये कमला हॅरिस यांची बाजी? ट्रम्प यांची कोणत्या मुद्द्यांवर कोंडी? निवडणुकीवर परिणाम किती?
Kolkata Rape Case News
TMC : कोलकाता बलात्कार प्रकरणावरून ममता बॅनर्जी गटाचे खासदार अभिषेक बॅनर्जींशी मतभेद? पक्षात दोन गटांची वेगळी मतं!
RSS, BJP, Mohan Bhagwat
भाजपला धोरणबदलाचा अप्रत्यक्ष सल्ला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका
Mammootty breaks silence
Mammootty : “चित्रपट म्हणजे समाजाचं प्रतिबिंब, त्यात..” ; हेमा समितीच्या अहवालावर अभिनेते मामुट्टींनी सोडलं मौन
kangana Ranaut is disappointed after the film Emergency did not get Censor Board certification
हतोत्साहित करणारे, अन्यायकारक! ‘इमर्जन्सी’ला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे कंगना राणावत निराश

‘इंडिया’ च्या बैठकीला मुंबईला आलेल्या अनेक नेत्यांकडे गठ्ठा मतदान नाही. यातील अनेक पक्षांची महाराष्ट्रात किती मते आहेत ते समोर आणले पाहिजे. आम्ही जिथे जातो तिथे लोक मोदींच्या नावाने येतात. आगामी निवडणुकीत महायुतीला ५१ टक्के मत मिळतील, असे बावनकुळे म्हणाले.

आणखी वाचा-गोंदिया : रानडुक्कराच्या हल्ल्यात तीन गावकरी जखमी

प्रकाश आंबेडकर यांना बोलवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांचा आहे, पण आंबेडकर यांची भूमिका काँग्रेस राष्ट्रवादीला कधीच पटली नाही.काँग्रेसची भूमिका मागासवर्गीय विरोधी, आंबेडकर विरोधी राहिली आहे त्यामुळे आंबेडकरांना आघाडीत सहभागी करून घेतले नसेल, असे बावनकुळे म्हणाले.बारामतीमध्ये महायुतीच जिंकणार, आहे तिन्ही नेते( शिंदे, फडणवीस पवार) हे महाविकास आघाडीचा करेकट कार्यक्रम करणार, असा दावा त्यांनी केला.