वाशिम : भारत देश म्हणजे हिंदू राष्ट्र आहे. जगाला धर्म देण्याचे काम भारताला करायचे आहे. सर्व जगातल्या लोकांना कसे जगावे, हे शिकविण्याची आपली जबाबदारी आहे. जगाला धर्म देण्यासाठी भारताला जगायचे आहे. आपापल्या संप्रदायाचे काम प्रत्येकाने सातत्याने केले पाहिजे, त्यासाठी समाजाचा व्यूह तयार व्हायला पाहिजे. लोकहितातून देशहीत साधायचे आहे. अशाने भारत देश विश्वगुरूपदी आरूढ झालेला लवकरच आपणास पाहायला मिळेल, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.

येथील वासुदेव आश्रमात दुर्मिळ चातुर्मास्य श्रौत याग श्रीकूष्मांड नवमी महोत्सवाच्या अनुषंगाने होत आहे. त्यानिमित्त सरसंघचालक भागवत येथे आले होते. ते पुढे म्हणाले, १८५७ पासून भारताच्या उत्थानास प्रारंभ झाला. नियती भारताला विश्वगुरूपदी आरूढ करणारच आहे. आमच्या पूर्वजांनी धर्माला अनुसरून कर्म दिले आहेत. संघात शाखा सर्व काही आहे पण कुठेही अतिवादिता नको. मनुष्याला आपल्या सेवेची योग्यता टिकवावी लागते.

Maharashtra Breaking News Live Updates in Marathi
Maharashtra Breaking News Updates : नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण, बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कोणाला पाठिंबा…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
maha Kumbh Mela and flow of techniques in Hindu religion culture society structure
‘कुंभमेळा’ आणि हिंदू धर्म-संस्कृती-समाज रचना यांतील तंत्र प्रवाह!
Mumbai Cop’s Soulful Flute Cover On Ae Watan
‘ऐ वतन – वतन मेरे आबाद रहे तू’…. मुंबई पोलिसाने सादर केले बासरी वादन; Viral Videoने जिंकले भारतीयांचे मन
Amitabh Bachchan
“अमिताभ बच्चन यांना ‘दीवार’ साठी निवडले, त्यावेळी….”, प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “राजेश खन्ना…”
Dr Mohan Bhagwat statement on religion
Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, धर्म म्हणजे….”
Loksatta natyarang Ramayana drama Urmilyan Indian culture
नाट्यरंग: ऊर्मिलायन;दृक् श्राव्यकाव्याची नजरबंदी
Vasai-Bhayander Ro-Ro service frequency increases
वसई- भाईंदर रो रो सेवेच्या फेऱ्यांमध्ये वाढ

हेही वाचा… फडणवीस, मुनगंटीवार यांना ठार मारण्याची धमकी; कट्टर विदर्भवादी बाबाराव मस्की यांच्यावर गुन्हा दाखल

हेही वाचा… बुलढाणा : मनोज जरांगे पाटील यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

ज्यांना कसलाच मोह राहिला नाही, ते म्हणजे मोहन भागवत, असे मत बंगळुरू येथील श्रुंगेरी महासंस्थानचे मठाधिपती विद्याविश्वेश्वर भारती शंकराचार्य महास्वामी महाराजांनी व्यक्त केले. सूर्य मावळताना आपले तेज शमी वृक्षात ठेवतो, त्याचप्रमाणे प.पू. पंडितकाका धनागरे महाराजांनी त्यांचे तेज प.पू. विजयकाका पोफळी महाराज यांच्यात प्रतिष्ठापित केले, असेही महास्वामी म्हणाले. करवीर संकेश्वर पीठाचे दगदगुरू शंकराचार्य सच्चितानंद अभिनव विद्या नृसिंह भारती महास्वामी महाराज यांनी ५० चातुर्मास्य याग केले आहेत, अशी माहितीसुद्धा श्रुंगेरीच्या शंकराचार्यांनी यावेळी दिली.

Story img Loader