लोकसत्ता टीम

नागपूर: पाणथळ संवर्धनात भारताने उत्तम कामगिरी बजावली असून मागील नऊ वर्षात ४९ नवीन पाणथळ जागा रामसर यादीत समाविष्ट झाल्या. त्यामुळे रामसर यादीत समाविष्ट पाणथळांची संख्या ७५ झाली आहे. विशेष म्हणजे यात महाराष्ट्रातील लोणार सरोवर, नांदूर मधमेश्वर आणि ठाणे खाडी तर गोव्यातील नंदा तलाव यांचा या यादीत समावेश आहे.

Municipal Corporation collected 205,854 idols in eco friendly ganesh visarjan
नाशिकमध्ये मूर्ती संकलनात यंदाही वाढ – १७५ मेट्रिक टन निर्माल्यही जमा
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
Two drowned in Nashik district search underway for one
नाशिक जिल्ह्यात विसर्जनावेळी दोघांचा बुडून मृत्यू, एकाचा शोध सुरू
Farmer suicide, Nashik, debt, Farmer suicide news,
नाशिक : शेतकऱ्याची कर्जामुळे आत्महत्या
16 districts of the state are anemic malnourished
राज्यातील १६ जिल्हे ऍनिमिया कुपोषित, मात्र ‘या’ २२ गावांची वाटचाल मुक्ततेकडे…
An eight-foot wooden bull history of Tanha Pola in Nagpur
अबब… आठ फुटांचा लाकडी बैल… नागपुरातील तान्हा पोळ्याचा असा आहे इतिहास…
Nagasakya Dam on Panzhan River remains dry even in heavy rains
मुसळधार पावसातही कोरड्या धरणाची कथा…
Sangli, Koyna, Chandoli Dam, flood,
सांगली : कोयना, चांदोली धरणातील विसर्गात वाढ; पाणलोट क्षेत्रात संततधार, कृष्णा, वारणा नद्यांना पूर

भारतात आशियातील रामसर पाणथळ ठिकाणांचे सर्वात मोठे क्षेत्र आहे. पाणथळ जमीन ही जैवविविधता, हवामान अनुकूलन, गोड्या पाण्याची उपलब्धता आणि एकूणच मानवी कल्याणासाठी अत्यंत महत्त्वाची परिसंस्था आहे. भारताकडे आता ७५ आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या रामसर यादीतील पाणथळ जमिनी आहेत, ज्यांचे क्षेत्र देशभरात १.३३ दशलक्ष हेक्टरावर व्यापलेले आहे. १९८२ ते २०१३ पर्यंत भारतातील २६ पाणथळ ठिकाणांचा रामसर यादीत समावेश होता. तो पुढे २०१४ ते २०२३ पर्यंत रामसर स्थळांच्या यादीत ४९ नवीन पाणथळ जागा समाविष्ट करण्यात आल्या.

हेही वाचा… उद्धवजी…राऊतांचे डोके तपासा! – अब्दुल सत्तारांचा सल्ला

एकट्या २०२२ मध्येच एकूण २८ पाणथळ ठिकाणांचा रामसर यादीत समावेश करण्यात आला. केंद्र सरकार देशभरातील पाणथळ प्रदेशांचे संवर्धन आणि व्यवस्थापन करण्यासाठी अनेक पावले उचलत आहे, ज्यामुळे पाणथळ प्रदेशांचे पर्यावरणीय स्वरूप जतन आणि व्यवस्थापन केले जात आहे.