वर्धा : औद्योगिक वसाहतीच्या ज्या भूखंडावर उद्योग उभारले गेले नाही, असे भूखंड परत घेण्याचे निर्देश राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात सामंत यांनी महाराष्ट्र औद्याेगिक विकास महामंडळाच्या वसाहती व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा आढावा घेतला. यावेळी खा. रामदास तडस, महामंडळाचे विजय राठोड, उपेंद्र तामोरे व अन्य उपस्थित होते.

एमआयडीसीचा आढावा घेताना त्यांनी जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींची स्थिती तसेच सुविधांची माहिती घेतली. जिल्ह्यातून एकूण सहा औद्याेगिक वसाहती असून जिथे भूखंडाची अधिक मागणी आहे अशा ठिकाणी अतिरिक्त जमिनीच्या संपादनाची कार्यवाही करावी. हिंगणघाट, कारंजा या औद्योगिक वसाहती अतिरिक्त भूखंडासह नवीन मंजूर आर्वीत ६७६ हेक्टर जमीन संपादीत केल्या जात आहेत. त्याचे लवकरच वाटप करण्याची सूचना मंत्र्यांनी केली.

Supreme Court orders submission of report on Mhada building developers mumbai
पुनर्विकासातील सामान्यांच्या ‘म्हाडा’ सदनिका अद्याप विकासकांकडेच? सर्वोच्च न्यायालयाकडूनही अहवाल सादर करण्याचे आदेश
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
ex finance minister of j and k haseeb drabu on Article 370
अनुच्छेद ३७० रद्द करून कोणी, काय मिळवले? जम्मू-काश्मीरचे माजी अर्थमंत्री हसीब द्राबू यांचा सवाल
maharashtra govt gave responsibility to ias officers for developing mmr as a growth hub
‘एमएमआर’च्या विकासाची जबाबदारी नोकरशहांकडे! राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी केंद्राची सूचना अमलात
Taloja, industrial smart city, smart city,
तळोजाची औद्योगिक स्मार्ट सिटीकडे वाटचाल
Raigad is engine of economic development in country after Mumbai due to IT industry says Devendra Fadnavis
आयटी उद्योगामुळे मुंबईनंतर रायगड हे देशातील आर्थिक विकासाचे इंजिन बनत आहे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
MPSC, autonomy MPSC, Interference MPSC, satej patil
‘एमपीएससी’च्या स्वायत्ततेत हस्तक्षेप?
Extortion from businessmen, retired officers, Food and Drug Administration
अन्न व औषध प्रशासन खात्यातील निवृत्त अधिकाऱ्यांमार्फत भीती दाखवून व्यावसायिकांकडून वसुली

हेही वाचा – अमरावती : कंत्राटी आरोग्‍य कर्मचाऱ्यांच्या संपामुळे यंत्रणा ठप्‍प

हेही वाचा – सणासुदीच्‍या दिवसांत एसटीला ६ कोटींचे उत्‍पन्‍न

वर्धा आणि देवळी येथील वसाहतीत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यासाठी ११ कोटी ७६ लाख रुपये मंजूर असून बांधकामाचे भूमीपूजन तातडीने करण्यात यावे. औद्योगिक वसाहतीत चांगल्या सुविधा निर्माण कराव्या. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात यावर्षी ५०० प्रकरणांचे उद्दिष्ट पूर्ण करावे. तसेच पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम व पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे अधिकाधिक प्रस्ताव मंजूर करावे. योजनेच्या जागृतीसाठी सरपंच व सचिवांची स्वतंत्र कार्यशाळा घ्यावी. अशी प्रकरणं मंजूर करताना सामाजिक भावना ठेवावी, अशाही सूचना उदय सामंत यांनी केल्या.