अकोला : शहरातील जुने शहर भागात समाजमाध्यमातील पोस्टवरून शनिवारी रात्री दंगल उसळल्याची घटना शनिवारी रात्री घडली. शहरातील चार पोलीस ठाण्याच्या परिसरात संचारबंदी लागू केली. खबरदारी म्हणून इंटरनेट सेवा रविवार दुपारपासून बंद करण्यात आली आहे. शहरातील परिस्थिती पूर्वपदावर येत असून तणावपूर्ण शांतता आहे.

समाजमाध्यमावर शनिवारी रात्री एक पोस्ट प्रसारित झाली होती. या पोस्टवरून एका विशिष्ट धर्मीय लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. १०० ते १५० जणांच्या जमावाने रामदासपेठ पोलीस ठाण्यात एकत्र येऊन तक्रार दाखल केली. दुचाकीवरून फिरत जमावाने जोरदार नारेबाजी करून शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. संतप्त जमावाकडून जुने शहरात प्रचंड हैदोस घालण्यात आला.

Lighting on trees, Navratri Utsav Mandals ,
डोंबिवलीत डीएनसी शाळा भागात नवरात्रोत्सव मंडळांकडून डेरेदार झाडांवर विद्युत रोषणाई
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Textile project of Reliance in Palghar
पालघरमध्ये रिलायन्सचा वस्त्रोद्याोग प्रकल्प; जमिनीच्या हस्तांतरासाठी एमआयडीसीचा अर्ज, दर मात्र गुलदस्त्यात
Pimpri-Chinchwad, vandalism vehicles Pimpri-Chinchwad,
VIDEO : तोडफोडीचे सत्र सुरूच: पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागांत २७ वाहनांची तोडफोड
entrepreneurs staged rasta roko protest against pcmc for not picking up waste in bhosari midc
पिंपरी : औद्योगिक परिसरात कचऱ्याचे ढीग; एमआयडीतीसील उद्योजकांचे आंदोलन
Contract recruitment continues through service provider company in government various departments
कंत्राटी भरतीचा पुन्हा धडाका, तीन वर्षे नियमित भरतीची शक्यता धूसर
Navi Mumbai is Semiconductor Hub start on the occasion of inauguration of Semiconductor Project
नवी मुंबई सेमीकंडक्टरचे हब, सेमीकंडक्टर प्रकल्प उद्घाटनाच्या निमित्ताने मुहूर्तमेढ
woman self help groups marathi news
यंदाचा गणेशोत्सव बचत गटांसाठी आर्थिक फलदायी, विविध वस्तू आणि खाद्यपदार्थ विक्रीतून १५ लाखांहून अधिकची आर्थिक उलाढाल

हेही वाचा – गोंदिया : स्वातंत्र्यानंतरही समतेची कविता लिहावी लागणे देशाचं दुर्दैव; ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाद जोशींनी व्यक्त केली खंत

चारचाकी, दुचाकी वाहनांची तोडफोड व जाळपोळ करण्यात आली. जमावाने प्रचंड दगडफेकदेखील केली होती. घरे व धार्मिकस्थळावरदेखील हल्ला करण्याचा समाजकंटकांनी प्रयत्न केला. जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराचा वापर करावा लागला. पोलिसांनी जमावावर बळाचा वापर केला. या घटनेत हरिहर पेठ येथील एकाचा मृत्यू झाला असून, दोन पोलिसांसह आठजण जखमी झाले आहेत. गंभीर परिस्थिती लक्षात घेत जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी शनिवारी रात्रीच कलम १४४ लागू करून जुने शहर, रामदास पेठ, शहर कोतवाली व डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या परिसरात संचारबंदी लागू केली.

हेही वाचा – अकोला : संचारबंदीमुळे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

शहरातील बिघडलेले वातावरण लक्षात घेता इंटरनेट सेवा ४८ तासांसाठी बंद करण्यात आली आहे. सर्व कंपन्यांचे इंटरनेट रविवारी दुपारीपासून बंद झाले. त्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. काही भागात एअरटेल कंपनीची इंटरनेट सेवा सुरू आहे. दरम्यान, सोमवारीदेखील संचारबंदीमुळे मुख्य बाजारपेठ बंद आहे. त्यामुळे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले आहेत.