गोंदिया : अर्जुनी मोर तालुक्याचे वैभव असलेले ईटियाडोह धरण आज २१ सप्टेंबरला सकाळी ७ वाजता ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे नदी काठावरील गावांना तसेच नदीपात्रातून आवागमन करणाऱ्या सर्व नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

निसर्ग सौंदर्याने नटलेला ईटियाडोह परिसर पावसाळ्याच्या दिवसात अधिकच खुलून दिसते. संपूर्ण मातीकामाने तयार करण्यात आलेला इटियाडोह धरण गाढवी नदीवर बनविण्यात आलेला आहे. सुट्ट्यांच्या दिवसात हजारो पर्यटक या धरणाला भेट देतात. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या धरणावर निसर्गाने सौंदर्याची मुक्त उधळण केली आहे.

tourism mahabaleshwar news in marathi
महाबळेश्वरला २६ ते २८ एप्रिल पर्यटन महोत्सवाचे आयोजन, शंभूराज देसाई यांची माहिती
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Will return both maces Chandrahar Patils stance in protest against umpire
दोन्ही गदा परत करणार! पंचाच्या निषेधार्थ चंद्रहार पाटलांची भूमिका
mhada lottery draw results today in presence of dcm Eknath Shinde
म्हाडाच्या २२६४ घरांसाठी आज सोडत; दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाण्यात कार्यक्रम
pimpri leopard news in marathi
पिंपरी : निगडीत बिबट्याचा शिरकाव; अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद
ravi rana supporter maha kumbh tour
भाविकांना महाकुंभला नेले अन् पळ काढला; रवी राणांच्या कार्यकर्त्याचा प्रताप
Rashtriya Swayamsevak Sanghs Virat shakha Darshan in Latur on Sunday
रा. स्व. संघाचे लातूरात रविवारी विराट शाखा दर्शन
mauni amavasya at mahakumbh
मौनी अमावस्या म्हणजे काय? महाकुंभात त्याचे महत्त्व काय?

हेही वाचा – अकोला : कृषी विद्यापीठात २० एकरावर साकारणार जिवंत पीक प्रात्यक्षिके; एकाच ठिकाणी २१० विविध पिकांच्या जाती, यंदा प्रथमच शिवार..

हेही वाचा – विदर्भातील एकमेव लाकडी गणपती ज्याचे विसर्जन होत नाही…

सन २०१३ नंतर तब्बल सहा वर्षांनी सन २०१९ ला आणि मागील वर्षी १५ ऑगस्ट २०२२ ला इंटियाडोह धरण ओव्हरफ्लो झाले होते. आता २१ सप्टेंबर २०२३ ला पहाटे सहा वाजता इटियाडोह धरण ओव्हरफ्लो झाले. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ईटियाडोह धरण पर्वताच्या मधोमध आहे. धरणापासून भंडारा, गोंदिया, गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमीन सिंचित करणारे धरण म्हणूनही प्रख्यात आहे. पर्यटकांनी नदीपात्र ओलांडू नये, शेतीची अवजारे नदीपात्रात ठेवू नये, जनावरांना नदीपात्र ओलांडू देऊ नये, जलाशयाच्या सांडव्यावरून ओव्हर फ्लो होणारा विसर्ग कमी जास्त असू शकतो, त्यामुळे नदीपात्राजवळ जाणे टाळावे, अशी सूचना केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोमनाथ कदम यांनी केली आहे.

Story img Loader