नागपूर : महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पात प्रस्तावित ६६० ‘मेगावॅट’चे दोन संच, अशा एकूण १ हजार ३२० मेगावॅटच्या प्रकल्पाविरोधात ‘जय विदर्भ पार्टी’ आता मैदानात उतरली आहे. पक्षाकडून १३ जून ते १९ जून २०२३ पर्यंत नागपुरातील संविधान चौकात साखळी उपोषणाची घोषणा करण्यात आली आहे.

विदर्भात मोठ्या प्रमाणात वीज निर्मितीनंतरही येथील जनतेला त्याचा फायदा नाही. उलट महावितरणवर ६७ हजार ६४४ कोटींचे कर्ज आहे. ते भरून काढण्यासाठी १ एप्रिलपासून वीज दरात ३७ टक्के वाढ करून जनतेचे कंबरडे मोडले गेले. जय विदर्भ पार्टीकडून या वीज दरवाढ आणि कोराडीतील प्रस्तावित नवीन प्रकल्पाविरोधात १३ जून ते १९ जून २०२३ पर्यंत संविधान चौकात साखळी उपोषण केले जाणार आहे.

fountain , Chandrapur , mosquitoes,
चंद्रपुरातील कारंजी बनली डास उत्पत्ती केंद्र
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Navi Mumbai , APMC , Unauthorized Construction ,
नवी मुंबई : एपीएमसीतील अनधिकृत बांधकामाला प्रशासनाचे अभय? कारवाई करून देखील धान्य बाजारातील अनधिकृत बांधकाम सुरूच
Bangladesh Settlement name change demand by local residents
ऐकावे ते नवलच! नागपूरच्या एका वस्तीच्या नावाने तेथील हजारो लोकांसमोर संकट…
Nagpur, palm trees, ashoka trees ,
नागपूर : वर्दळीच्या रस्त्यावरील १५० पाम, ४१० अशोकाची झाडे तोडली
ग्रामीण भागात घरफोडी करणारा चोरटा गजाआड; चोरट्याकडून १६ लाखांचा ऐवज जप्त
Mumbai Municipal Corporation will levy property tax on commercial slums to boost Revenue starting surveys
झोपडपट्यामधील व्यावसायिक गाळेधारक मालमत्ता कराच्या कक्षेत सुमारे ६०० झोपड्यांना पाठवली देयके
pcmc issue notices to 221 major construction companies for violating environmental regulations
पिंपरी : प्रदूषण करणाऱ्या २२१ बांधकाम व्यावसायिकांना दणका; महापालिकेने केली ‘ही’ कारवाई

हेही वाचा – अमरावती : मेळघाटात भीषण अपघात टळला; बस दरीत उलटून झाडांना अडकली; चालकासह ७ प्रवासी जखमी

आंदोलनात नागरिकांनी सहभागी होण्याची मागणीही पक्षातर्फे अरुण केदार, विष्णुपंत आष्टीकर, सुयोग निलदावार, रंजना मामर्डे, मुकेश मासुरकर यांनी केली. शासनाने ही मागणी मान्य न झाल्यास पुढे आंदोलन आणखी तिव्र करण्याचा इशाराही जय विदर्भ पक्षाकडून दिला गेला आहे. कोराडीतील नवीन प्रकल्पामुळे कोराडी व नागपूर शहरात मोठया प्रमाणात प्रदूषण वाढणार आहे. अगोदरच्या प्रकल्पामुळेच कोराडीच्या २० किमी परिसरात शेती करने अशक्य झाले आहे. सयंत्रामधून निघणाऱ्या राखेमुळे शेतीत पिकांचे उत्पादन घटले आहे. नागरिकांना श्वास, दमा, कॅन्सर, हृदयरोगासारख्या जीवघेण्या आजाराने त्रास होत आहे.

हेही वाचा – गोंदिया : पोलीसच सुरक्षित नाही तिथे सामान्यांचं काय? रात्रगस्तदरम्यान दोन पोलिसांना मारहाण

नवीन वीज निर्मिती सयंत्र स्थापित झाल्याने नागरिकांचे जगणे मुश्किल होणार आहे. स्थानीय आमदार, खासदार यांनी या वीज प्रकल्पाचा विरोध केला नाही. कारण यामागे त्यांना मलाई मिळते, असा आरोपही जय विदर्भ पक्षाकडून केला गेला. विदर्भातील वीज दर निम्म्याने कमी करण्याची मागणीही यावेळी केली गेली.

Story img Loader