बुलढाणा : होय! सांप्रदायिकता व कट्टरवादाने कळस गाठला अन किरकोळ कारणावरून विभिन्न धर्मियांत दंगली घडविल्या जातात. कधी हा धर्म तर कधी दुसरा धर्म ‘खतरेमे’ असल्याची आवई उठविली जाते. मात्र अजूनही भारत देशाची अखंडता व विविधतेत एकता कायम असून यासाठी अनेक समाजघटक निरपेक्षपणे कार्यरत आहे.

जिल्ह्यातील जयपूर (ता. मोताळा) हे गाव याचे मासलेवाईक व आदर्श उदाहरण ठरावे. मंदिर-मशीदवरून वर्षानुवर्षे राजकारण घडविले जात आहे. या दुर्देवी पार्श्वभूमीवर जयपूर या गावात ईश्वर व अल्लाह एकत्र नांदतो. हनुमान मंदिर व मशीद सख्खे शेजारी असल्यासारखे नांदतात. दहा दिवस लगतच गणपती बाप्पा विराजमान केल्या जातो. संध्याकाळची नमाज झाल्यावर गणराय व मंदिरातील आरती केली जाते. यामध्ये सर्वच धर्मीय अन् जाती जमातीचे ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने सहभागी होतात.

Dhananjay Munde on Namdev Shastri Maharaj
Dhananjay Munde : महंत नामदेव शास्त्री महाराजांनी पाठिंबा दर्शवल्यानंतर धनंजय मुंंडेंनी व्यक्त केल्या भावना; म्हणाले, “इतकी मोठी शक्ती…”
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
lokmanas
लोकमानस: हा तर श्रद्धेचा राजकारणासाठी वापर
Shahid Kapoor
“जवळच्या गोष्टींचा त्याग…”, ‘देवा’ चित्रपटासाठी शाहिद कपूरने केली ‘ही’ गोष्ट; म्हणाला, “एक कलाकार म्हणून…”
Yogi Adityanath News
Yogi Adityanath : योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य, “सनातन धर्म हाच आपला राष्ट्रधर्म आहे, सगळ्यांनी…”
raj babbar nadira religion
राज बब्बर यांच्या कुटुंबाला करायचं होतं मुस्लीम नादिराचं धर्मांतर; मुलीचा खुलासा, म्हणाली, “फक्त एका ख्रिश्चन…”
which district is the only temple in the country with an idol of Sati located
सतीची मूर्ती असलेले देशातील एकमेव मंदिर आहे या जिल्ह्यात

हेही वाचा – चिखलीतील शासकीय वसतिगृहातील ६ विद्यार्थिनींना विषबाधा, खासगी रुग्णालयात उपचार सुरू; प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?

हेही वाचा – राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आंदोलन तीव्र; चंद्रपूर-नागपूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन

गणेशोत्सवच नव्हे तर सर्व सण उत्सव एकोप्याने साजरे केले जातात. रमजानला शिरखुरम्याचा सर्वच गावकरी स्वाद घेतात तर दिवाळीच्या फराळ व अन्य सणांना होणाऱ्या गोड धोड पदार्थांची ‘भाईजान’ चव चाखतात. गावातील बुजुर्ग, माजी सरपंच विक्रम देशमुख, जामा मज्जिदचे इमाम हाफिज साजिद खान ही बाब साधेपणाने सांगतात. त्यात अहंकार वा अभिमानाचा लवलेशही नसतो. जातीयवाद, धार्मिक संघर्ष, कट्टरता हे शब्द जयपूरच्या सामाजिक शिकवणीत किंबहुना शब्दकोषातच नाहीये.

Story img Loader