वर्धा : आज खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांप्रती विशेष काळजी घेण्याची सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना केली. बाजारात या हंगामात नकली बियाणे येण्याची शक्यता असते. म्हणून खरेदी केलेल्या बियाणे खरेदीच्या पावत्या शेतकऱ्यांनी जपून ठेवाव्या. तशी माहिती शेतकऱ्यांना द्या. बियाणे नकली आढळून आल्यास थेट फौजदारी कारवाई करण्याची सूचना त्यांनी सभेत दिली.

पांधन रस्त्याच्या कामाबाबत त्यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली. गतवर्षीपेक्षा आता चांगले काम झाले पाहिजे. पुढील बैठकीत मी आढावा घेणार, अशी तंबीही त्यांनी दिली. हिंगणघाट येथे वैद्यकीय महाविद्यालय देण्याबाबत मागणी होत असल्याचे निदर्शनास आणल्यावर फडणवीस म्हणाले की असा प्रस्ताव आमदार कुणावार यांनी दिला. त्यात काय मार्ग काढता येईल हे बघावे लागेल.

Rajarambapu Patil Cooperative Sugar Factory will provide 2 5 lakh sugarcane seedlings to farmers
राजारामबापू कारखाना शेतकऱ्यांना २५ लाख ऊसरोपे पुरवणार
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Emphasis on exports of finished goods Prime Minister appeals for value addition of raw materials
तयार मालाच्या निर्यातीवर भर; कच्च्या मालाचे मूल्यवर्धन करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन
सतीश आळेकर यांना ‘जनस्थान’; १० मार्च रोजी नाशिकमध्ये पुरस्काराने गौरव
Shetkari sangharsh samiti demands cancellation of Pune-Nashik Industrial Expressway pune
पुणे- नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग रद्द करावा; शेतकरी संघर्ष समितीची मागणी
Two attempted self immolations occurred in Jalgaon and Nashik districts on Republic Day January 26
जळगाव, नाशिक जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनी दोघांचा पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
MLA Ravindra Chavan, Commissioner Dr. Indurani Jakhar and other officials.
डोंबिवली शहर विकासासाठी ६१ कोटीचा आराखडा, भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची कडोंमपा अधिकाऱ्यांबरोबर बैठक
Pune-Nashik railway , old route, Mahayuti,
पुणे-नाशिक रेल्वे जुन्याच मार्गावरून हवी, विरोधकांसह महायुतीच्या लोकप्रतिनिधींचीही मागणी

हेही वाचा – अकोला : ..तर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका; १ जूननंतरच कपाशी बियाणे विक्री होणार

सभागृहात वीज तोडल्या जात असल्याची बाब उपस्थित झाली. एका डीपीवरील पंधरा जोडणी असलेल्यापैकी पाचजण बिल भरत नसतील तरी सर्वांचाच वीज पुरवठा तोडल्या जातो. अशी तक्रार आमदार रणजीत कांबळे यांनी केल्यावर त्यात लक्ष घालण्याची सूचना फडणवीस यांनी संबंधित अधिकारी वर्गास केली. बियाणे कमी पडणार नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.

Story img Loader