बुलढाणा: पावसाळा संपला असला तरी यंदा  पावसाची तूट कायम आहे. याचा परिमाण रब्बी हंगामावर होण्याची शक्यता असतानाच आता परतीच्या पावसावर जिल्ह्याची भिस्त असल्याचे चित्र आहे. यंदाच्या पावसाळ्यात अनियमित व अपुऱ्या पावसाची नोंद झाली. अंतिम टप्प्यात काही तालुक्यात दमदार पाऊस व अतिवृष्टी झाल्याने परिस्थिती सुधारली. मलकापूर तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १११.१६ टक्के पावसाची नोंद झाली. याखालोखाल शेगाव ९५ टक्के, जळगाव ९३ या तालुक्यात दमदार पावसाची  नोंद झाली. मात्र इतर ९ तालुक्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमीच पाऊस झाला आहे.

बुलढाण्यात ४० टक्के तूट

बुलढाणा तालुक्यातील तूट लक्षणीय असून केवळ ६१ टक्के पाऊस झाला आहे. पाऊस किती अपुरा हे स्पष्ट होते. चिखली ६४,  लोणार६७,  संग्रामपूर ७० मधील तूट गंभीर आहे. उर्वरित पाच तालुक्यात ७४ ते ८५ टक्के पावसाने हजेरी लावली.

article about sahyadri sankalp society information
सर्वकार्येषु सर्वदा : पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्याचा ‘संकल्प’
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
betel leaves expensive, betel leaves,
विड्याची पाने का महागली ? जाणून घ्या, अतिवृष्टी, संततधारेचा परिणाम काय?
Driving a scooty in the wrong way
चुकीच्या पद्धतीने स्कुटी चालवल्याने उद्भवतील अनेक समस्या; ‘या’ टिप्स करतील मदत
Mogra Udanchan Center, court, mumbai,
मोगरा उदंचन केंद्राचे काम मार्गी लागण्याची शक्यता, न्यायालयीन सुनावणीमुळे दोन वर्षे रखडलेला प्रकल्प वर्षाअखेरीस सुरू होण्याची शक्यता
Two people washed away, flood Wardha,
वर्धा : दुचाकीसह दोघे पुरात वाहून गेले, दोन दिवसात…
When the rains return now there is a cyclone warning
हे काय..! पावसाच्या परतीची वेळ असताना आता चक्रीवादळाचा इशारा
rain Pune, Pune rain news, Pune weather,
पुण्यात सरींवर सरी

पेरा घटणार?

 दरम्यान अपुरा पाऊस  व जमिनीतील ओला चा अभाव लक्षात घेता रब्बीच्या पेऱ्यात घट येण्याची शक्यता आहे. दमदार परतीच्या पावसाने हजेरी लावली तरच हे चित्र बदलेल. जिल्ह्याचे रब्बीचे क्षेत्र कमीअधिक १ लाख ४० हजार  हेक्टर आहे. पावसाने’ परत’ हुलकावणी दिली तर पेरा १ लाखाच्या आसपास जाईल.तसेच गव्हाचे पेरा क्षेत्र कमी होऊन हरभऱ्याची जास्त लागवड होण्याची दाट शक्यता आहे.