बुलढाणा: पावसाळा संपला असला तरी यंदा  पावसाची तूट कायम आहे. याचा परिमाण रब्बी हंगामावर होण्याची शक्यता असतानाच आता परतीच्या पावसावर जिल्ह्याची भिस्त असल्याचे चित्र आहे. यंदाच्या पावसाळ्यात अनियमित व अपुऱ्या पावसाची नोंद झाली. अंतिम टप्प्यात काही तालुक्यात दमदार पाऊस व अतिवृष्टी झाल्याने परिस्थिती सुधारली. मलकापूर तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १११.१६ टक्के पावसाची नोंद झाली. याखालोखाल शेगाव ९५ टक्के, जळगाव ९३ या तालुक्यात दमदार पावसाची  नोंद झाली. मात्र इतर ९ तालुक्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमीच पाऊस झाला आहे.

बुलढाण्यात ४० टक्के तूट

बुलढाणा तालुक्यातील तूट लक्षणीय असून केवळ ६१ टक्के पाऊस झाला आहे. पाऊस किती अपुरा हे स्पष्ट होते. चिखली ६४,  लोणार६७,  संग्रामपूर ७० मधील तूट गंभीर आहे. उर्वरित पाच तालुक्यात ७४ ते ८५ टक्के पावसाने हजेरी लावली.

Salwan Momika Iraqi man burned Quran in Sweden shot dead
मशिदीसमोर कुराण दहन करणाऱ्या व्यक्तिची गोळ्या घालून हत्या; कोण होते सलवान मोमिका?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Kaaba
पवित्र काबाला झाकण्यासाठी वापरण्यात येणारे ‘किस्वाह’ नेमके काय आहे?
Hemant Dome
अमेय वाघ व हेमंत ढोमे यांच्यात अनेक वर्षे होता अबोला; खुलासा करत म्हणाले, “खूप भयानक…”
israel hamas ceasefire
इस्रायल-हमास युद्धविराम करार काय आहे? सुटका करण्यात येणारे ३३ ओलीस कोण आहेत? याचा अर्थ युद्ध आता संपेल का?
Sandeep Deshmukh Wardha district Ajit Pawar NCP group
वर्धा जिल्ह्यात सहकार गटात उभी फूट, एकाच घरी दोन झेंडे
Uday Samant on Vijay Wadettiwar
Uday Samant: “भाजपामध्ये येण्यासाठी तुम्ही फडणवीसांना…”, उदय सामंत यांचा विजय वडेट्टीवारांवर पलटवार, दिले होते राजकीय भूकंपाचे संकेत
Dhananjay Munde
“पहाटेची शपथ घेऊ नका असं सांगितलेलं तरी…”, राष्ट्रवादीच्या शिबिरात धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट

पेरा घटणार?

 दरम्यान अपुरा पाऊस  व जमिनीतील ओला चा अभाव लक्षात घेता रब्बीच्या पेऱ्यात घट येण्याची शक्यता आहे. दमदार परतीच्या पावसाने हजेरी लावली तरच हे चित्र बदलेल. जिल्ह्याचे रब्बीचे क्षेत्र कमीअधिक १ लाख ४० हजार  हेक्टर आहे. पावसाने’ परत’ हुलकावणी दिली तर पेरा १ लाखाच्या आसपास जाईल.तसेच गव्हाचे पेरा क्षेत्र कमी होऊन हरभऱ्याची जास्त लागवड होण्याची दाट शक्यता आहे.

Story img Loader