नागपूर: राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला कधी काळी ‘हुरडा पार्टी’ अधिवेशन संबोधले जायचे. सभागृहात परस्परांवर तुटून पडणारे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते सभागृहाबाहेर पडल्यावर मात्र ऐकमेकांचे मित्र असल्यागत वागत. कालांतराने यात बदल झाला. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यावर सदस्यांमधली कटुता वाढली. मात्र अजूनही काही जण याला अपवाद आहेत. यात काही ज्येष्ठ आहेत तर काही तरुण सदस्यही आहेत. अशाच एका कॉंग्रेसच्या जुन्या ज्येष्ठ नेत्याची आणि कॉंग्रेसपासून दुरावलेल्या तरूण नेत्यांची भेट हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवन परिसरात झाली. ते होते कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि विधान परिषद सदस्य सत्यजित तांबे.

अशोक चव्हाण यांनी  सत्यजीत तांबे भेट झाल्यावर चव्हाण म्हणाले, “काय सत्यजित आवाज देत नाहीस” . त्यावर सत्यजित तांबें यांनी प्रतिउत्तरा दाखल चव्हाण यांना ‘काय साहेब तुम्ही आमचा आवाज बंद केला’ असा सवाल केला.

Vijay Wadettiwar and Sanjay Gaikwad
गायकवाड यांना वडेट्टीवार यांचे प्रत्युत्तर ,म्हणाले ‘पन्नास खोके घेणाऱ्यांना सत्तेची मस्ती’
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
What Ravneet Bittu Said About Rahul Gandhi?
Rahul Gandhi : “राहुल गांधी देशातले एक नंबरचे दहशतवादी, त्यांच्यावर बक्षीस..” केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू यांचं वक्तव्य
CM Siddaramaiah
CM Siddaramaiah : कर्नाटकात का होतेय मुख्यमंत्री बदलाची चर्चा? सिद्धरामय्यांशी निष्ठावान समजल्या जाणाऱ्या ‘या’ नेत्यांची CM पदासाठी चर्चा!
bjp haryana
हरियाणात भाजपाची वाट बिकट, उमेदवार यादी जाहीर होताच पक्षातील नेत्यांचे राजीनामे; काँग्रेस मारणार बाजी?
Where are the modern Indian political thinkers says Yogendra Yadav
आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत आहेत कुठे?
smriti irani praise rahul gandhi
Smriti Irani : टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या स्मृती इराणी यांनी केलं राहुल गांधींचं कौतुक; म्हणाल्या, “आता त्यांचे राजकारण..”
jammu Kashmir polls
विश्लेषण: निष्ठावंतांची नाराजी भाजपला जम्मू व काश्मीरमध्ये भोवणार? नव्या चेहऱ्यांना संधी?

हेही वाचा… नाना पटोले आणि आशिष शेलार यांचे हस्तांदोलन, संजय शिरसाठही सोबत; काय झाली चर्चा? वाचा…

दोन्ही नेत्यांची काही वेळाची भेट कॉंग्रेस जणांना भूतकाळात घेऊन गेली. नाशिक पदवीधर निवडणुकीत तांबे यांची उमेदवारी चांगलीच चर्चेत राहिली होती. फेब्रुवारी २३ मध्ये  झालेली ही निवडणूक काँग्रेस पक्षामधील अंतर्गत वादामुळे गाजली. पक्षाने सत्यजित ऐवजी त्यांच्या वडिलांना उमेदवारी दिली. ती सत्यजित यांना हवी होती. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी अर्ज न भरता सत्यजित यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. त्यामुळे कॉंग्रेसने सत्यजित तांबे आणि त्यांचे वडील सुधीर तांबे यांना पक्षातून निलंबित केले.  

हेही वाचा… “अहो भुजबळ, संवैधानिक पद आहे तर भाषणे सोडा अन् लोकांची कामे करा, नाही तर…” कोण देतोय असा सल्ला?

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबे विजयी झाल्यानंतर सत्यजित यांचे मामा आणि काँग्रेस गटनेते बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेल्या शिवसेना उमेदवार शुभांगी पाटलांचा पराभव झाला  होता. या सर्व घटनाक्रमामुळे सत्यजित कॉंग्रेसपासून दुरावले. मात्र ते मुळचे कॉंग्रेसचे असल्याने व मामा व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यामुळे सत्यजित यांचे कॉंग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांशी अत्यंत स्नेहाचे संबंध आहे. याच संबंधातून गुरूवारी अशोक चव्हाण यांनी त्यांना आवाज दिला व त्याला सत्यजित यांनी प्रतिसाद दिला.

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक हे नेहमीच डिवचत असतात. आजही त्यांनी विधानभवन परिसरात गोगावलेंना मंत्रिपदावरुन डिवचल्याचं सर्वांनी पाहिलं.