लोकसत्ता टीम

वर्धा : सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्प वन्यजीव व मनुष्य यातील संघर्षाने नेहमी चर्चेत असतो. गावांचे पुनर्वसन करण्याची सातत्याने मागणी होते. मात्र अद्याप हालचाल नाहीच. त्यातूनच गुरुवारी रात्री घडलेली घटना गावकरी मंडळीचा रोष ओढविणारी ठरली.

Kalyan West youth chasing youth with sword in his hand and trying to kill him caputured in CCTV
कल्याणमध्ये तलवार हातात घेऊन हल्लेखोराचा तरूणाला मारण्याचा प्रयत्न
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
villagers protested against daighar garbage project
ठाण्यात पुन्हा कचराकोंडीची चिन्हे; डायघर प्रकल्पास ग्रामस्थांचा विरोध, देयके मिळत नसल्याने ठेकेदाराने रोखल्या घंटागाड्या
cops molested young lady attempted kidnapping two vasai policemen suspended
पोलिसांकडूनच तरुणीचा विनयभंग, अपहरणाचा प्रयत्न; नागरिकांनी पोलिसांना चोपले, वसईतील दोन पोलीस निलंबित
car police viral video loksattA
Video: चिंचवडच्या आरोपीने पोलिसांच्या अंगावर घातली गाडी; पोलीस अधिकारी थोडक्यात बचावले
man stabbed due to drunken argument one arrested for attempted murder
दारु पिताना झालेल्या वादातून मेहुण्याला भोसकले, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकास अटक
Naigaon police, Naigaon police saved women,
वसई : नायगाव पोलिसांचे १५ दिवसातील कौतुकास्पद कार्य, आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या तीन महिलांचे वाचवले प्राण
after nephew shocked while dancing group of people beat up uncle with stone
पुणे :नाचताना पुतण्याचा धक्का लागल्याचे निमित्त,टोळक्याकडून काकाला बेदम मारहाण

सेलू तालुक्यातील हिवरा येथील असलेले एक शेतकरी सायंकाळी सात वाजता शेतात जात होते. तेव्हा गावाच्या लगत हाकेच्या अंतरावर नदीकाठी त्यांना वाघ असल्याचा भास झाला. हातातील टॉर्चच्या प्रकाशात त्यांनी पाहणी सूरू केली. तेव्हा झुडपात बिबट दिसून आला. प्रकाश डोळ्यावर पडल्याने बिबट चवताळला. त्याने शेतकऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या शेतकऱ्याने हातातील पिशवी बिबटच्या दिशेने भिरकावली आणि गावाकडे धूम ठोकली. पण बिबट्यानेही हार नं मानता शेतकऱ्याचा पाठलाग सूरू केला.

आणखी वाचा-संघ पदाधिकाऱ्यांबरोबर फडणवीसांची चर्चा; चर्चेनंतर लगेच दिल्लीकडे रवाना

घाबरलेल्या त्या शेतकऱ्याने दगडफेक करीत कसेबसे बिबट्यास हाकलून लावले. बिबट आणि शेतकऱ्यात असे युद्ध रंगले असतांनाच बिबट्याच्या पिल्लाचा टाहो सूरू झाला. पळ काढलेल्या शेतकऱ्याच्या आवाजाने गावकरी जमा झालेत. बिबट पळून गेला असल्याने शेवटी उपस्थित गावाकऱ्यांनी त्या अनाथ पिल्लास ताब्यात घेतले. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, असा नेहमी अनुभव घेणाऱ्या गावाकऱ्यांनी भूतदया दाखवीत त्या पिल्लास सोबत नेत गावातील एका घरी सुरक्षित ठेवले.

काही काळ त्यास जोपासले. या घटनेची माहिती मिळाल्यावर दोन तासांनी वन विभागाचे कर्मचारी गावात पोहचले. तेव्हा गावाकऱ्यांच्या संतापास त्यांना सामोरे जावे लागले. उपस्थित शेतकऱ्यांनी मग त्यांच्यावर संताप व्यक्त केला. गावात बिबट व अन्य हिंस्त्र पशुचे हल्ले होत असतात. आता आम्हीच या प्राण्यांना ठार मारून टाकायचे का, असा सवाल करण्यात आला. मात्र कर्मचारी निरुत्तर होते. कसेबसे त्यांनी गावकरी मंडळीस आश्वस्त केले. घरात ठेवलेल्या बिबटाच्या पिल्ल्याचा त्यांनी ताबा घेतला. आणि काढता पाय घेतला. या पिल्लाच्या उजव्या डोळ्यास थोडी जखम झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आणखी वाचा-विदर्भात लोकसभेचा विधानसभानिहाय कौल कोणाच्या फायद्याचा ?

अश्या घटना सातत्याने घडत आहे. तीन दिवसापूर्वी वाई गावात रात्रीच्या वेळेस बिबट्याने गायीचा फडश्या पाडला होता. रोहणा येथील गोपालक संजय बोन्द्रे यांची वाईत शेती आहे. याच शेतात ते गाय व अन्य जनावरे बांधून ठेवतात. रात्रीच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात प्रवेश करीत गायीची शिकार केली. त्यामुळे बोन्द्रे यांना तीस हजार रुपयाचा फटका बसला. बिबट्याचा या परिसरात वावर असल्याने पशू पालकांमध्ये घबराट निर्माण झाली असल्याची चर्चा होते. वन विभागाने पंचनामा करीत पीडित शेतकऱ्यास योग्य ती नुकसानभरपाई देण्याची खात्री दिली आहे. बिबट्याना आता आवर कसा घालणार, असा प्रश्न केल्या जात आहे.