चंद्रपूर : चांदा आयुध निर्माणीत दोन दिवसांपूर्वी बिबट्याला जेरबंद केल्यानंतर पुन्हा एका बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. वसाहतीतील सेक्टर पाचमध्ये बिबट्याने एका महिलेवर हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी सायंकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास घडली. जखमी महिलेला चंद्रपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विमलादेवी टिकाराम (४२), असे जखमी महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे नागरिकांत प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा – नागपूर : बॅंकेतून काढलेली ९ लाखांची रक्कम भर दुपारी दुचाकीस्वारांनी पळवली

Woman murdered in broad daylight in Ambernath
अंबरनाथमध्ये भरदिवसा महिलेची हत्या; पूर्वेतील उड्डाणपुलाशेजार घडली घटना, अंबरनाथमध्ये खळबळ
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Woman murdered in Ambernath
अंबरनाथमध्ये भरदिवसा महिलेची हत्या; पूर्वेतील उड्डाणपुलाशेजार घडली घटना, अंबरनाथमध्ये खळबळ
SC to hear plea seeking safety measures for devotees at Mahakumbh on Feb 3
कुंभमेळ्यासंबंधी याचिकांवर आज सुनावणी
Crime News
Crime News : होमिओपॅथी डॉक्टरचे भयानक कृत्य! गर्लफ्रेंड आणि तिच्या वडिलांचा मृतदेह ४ महिने घरात दडवला, कुजू नयेत म्हणून…
Newlywed women commits suicide after argument with mother in law over using sanitary pads
‘सॅनिटरी पॅड’वरुन वाद झाल्याने नवविवाहित सुनेची आत्महत्या
pimpri female patient dies due to guillain barre syndrome
पिंपरी : गुइलेन बॅरे सिंड्रोमची लागण झालेल्या महिलेचा न्यूमोनियामुळे मृत्यू
Pune Mumbai Bangalore bypass road accident news update in marathi
भरधाव मोटार बसवर आदळून महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू

हेही वाचा – बुलढाणा : ‘‘ठाणेदार साहेब, आमचा चोरलेला पक्ष आणि धनुष्यबाणाचा तपास लावा हो!”

विमलादेवी नेहमीप्रमाणे सायंकाळी फिरायला निघाल्या असता दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. मानेच्या मागील भागाला गंभीर दुखात असल्याने त्यांना प्राथमिक उपचार करून चंद्रपूरच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. दोन दिवसांपूर्वीच वनविभागाच्या पथकाने चांदा आयुध निर्माणी वसाहतीत पहाटेच्या सुमारास बिबट्याला जेरबंद केले होते. या लोकवस्तीत अनेक हिंस्त्र वन्यप्राण्यांचा वावर आहे. वनविभागाने आयुध निर्माणी प्रशासनाला मानवी वस्ती भागातील जंगलाची कटाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, अजूनपर्यंत अंमलबजावणी झाली नाही. नागरिकांनी कुत्र्यांना सोबत घेऊ नये, कुत्रे पाळू नये आणि पहाटे आणि सायंकाळी रस्त्याने पायदळ तसेच दुचाकीने फिरू नये, अशा सूचना दिल्या होत्या. परंतु, याचे पालन केले जात नाही. या भागात ४ पिंजरे लावण्यात आले आहे.

Story img Loader