लोकसत्ता टीम

वर्धा : विदेशात भाजीपाला निर्यात करण्यासाठी आवश्यक असणारे परवाना प्रमाणपत्र शेतकऱ्यांना देण्यात आले असून राज्यात असे हे पहिलेच उदाहरण ठरले आहे.

diverting surplus water from ulhas and vaitrana sub basins godavari basin in Marathwada
बदलापूरः उल्हासचे प्रदुषित पाणी मराठवाड्याला नेणार का ? पर्यावरणप्रेमींचा सवाल, उल्हास, वैतरणाचे पाणी मराठवाड्यात नेण्याच्या निर्णयावर नाराजी
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Electricity system Maharashtra, strike employees,
राज्यातील वीज यंत्रणा कोलमडणार! कर्मचाऱ्यांनी पुन्हा उगारले संपाचे अस्त्र
Self defense class, ITI, Maharashtra,
राज्यातील ‘आयटीआय’मध्ये आत्मसंरक्षणाचा वर्ग भरणार, राज्यातील महिलांसाठी ‘हर घर दुर्गा अभियान’
Nirbhaya Squad, Maharashtra, women’s safety, Nirbhaya Squads in Maharashtra Remain Largely Inactive, police commissionerates, Nagpur,
राज्यातील निर्भया पथक कागदावरच!
low price to mung, soybean, mung price,
सोयाबीननंतर मूगही कवडीमोल, राज्यातील बाजार समित्यांमध्ये किती दर ?
Symbolic shutdown of food grain traders tomorrow wholesale and retail markets across the state closed
अन्नधान्य व्यापाऱ्यांचा उद्या लाक्षणिक बंद, राज्यभरातील घाऊक आणि किरकोळ बाजारपेठा बंद
Nagpur, cyber crime, financial fraud, sextortion, Maharashtra, Mumbai, Pune, Nagpur, trained staff, cyber police, public awareness, cyber crime news
सायबर गुन्हेगार ग्राहकांना जाळ्यात अडकविण्यासाठी करतायेत तरुणींचा वापर; दिवसाला शेकडोंवर…

सेवाग्राम आश्रमात कृषीमाल निर्यात व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन फलोत्पादन व औषधी मंडळ तसेच सहकार विकास मंडळ यांच्या सहकार्याने जिल्हा प्रशासनाने केले होते. याच कार्यक्रमात प्रशिक्षीत शेतकऱ्यांना आयातनिर्यात परवाना प्रमाणपत्र देण्यात आले. निर्यातदारांना त्यांचा माल परदेशात पाठवायचा असतो, तेव्हा कस्टम बंदरावर निर्यात परवाना दाखविणे बंधंनकारक आहे. तसेच निर्यातदारांना त्यांच्या खात्यात परकीय चलन मिळते तेव्हा बँकेकडून निर्यात परवाना मागितल्या जातो. या ठिकाणी संपन्न निर्यात व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमात ३२ शेतकऱ्यांना हे प्रमाणपत्र देण्यात आले. राज्यातील हे पहिलेच उदाहरण ठरले आहे.

आणखी वाचा-चित्ते आता नामिबियाऐवजी दक्षिण आफ्रिकेतूनच; प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात सरकाचे सावध पाऊल

जिल्हाधिकारी राहूल कर्डिले म्हणाले की वर्धा जिल्ह्यातून निर्यात वाढविण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात असून काही दिवसातच मोठ्या प्रमाणात निर्यात झाल्याचे दिसून येईल. आळंदी (पूणे) येथील निर्यातदार जयसिंग थोरवे म्हणाले की वर्धा जिल्ह्यातील केळी, वायगावी हळद तसेच विविध डाळी निर्यात करण्यासाठी उत्तम आहे. या शेतमालांची शेतकऱ्यांकडून खरेदी करून त्यांना योग्य मोबदला देत निर्यात योग्य माल खरेदी केल्या जाईल, अशी हमी त्यांनी दिली. विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वाशिम, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया व वर्धा या जिल्ह्यातील शेतकरी या पाच दिवसीय प्रशिक्षणात सहभागी झाले होते.