‘प्रतिपालकमंत्री’ हा अलीकडे माध्यमांनी रूढ केलेला शब्द. सध्या तो वापरला जातोय वाल्मीक कराडच्या संदर्भात. कोठडीत असलेल्या या कराडांची काळी कृत्ये रोज चव्हाट्यावर येऊ लागलेली. बीडमधील सरपंचाचा खून व खंडणी प्रकरणानंतर चर्चेत आलेले कराड राज्यातील एकमेव आहेत असे समजण्याचे काही कारण नाही. व्यापक दृष्टिकोनातून बघितले तर ही कराड नावाची वृत्ती तुम्हाला ठिकठिकाणी आढळेल. मग ते गाव असो, तालुका वा जिल्ह्याचे ठिकाण. एक कराड अस्तित्वात आहेच. तोही तेच काम करतो जे कराड करायचा. कदाचित खून व मारामारीपर्यंत या प्रत्येकाची मजल गेली नसेलही पण जिल्ह्याचे ठिकाण असेल तर प्रतिपालकमंत्री म्हणून या सर्वांचे वावरणे नेहमी दिसणारे. यात विदर्भातील कुणाही पालकमंत्र्याला दोष द्यायचा नाही पण अशी व्यवस्था निर्माण कशी होते? त्याला जबाबदार कोण? केवळ मंत्रीच नाही तर राजकीय नेते सुद्धा असे कराड निर्माण करण्यात आघाडीवर असतात. ती त्यांची गरज असते का? असेल तर नेमकी कशासाठी याची उत्तरे शोधायला गेले की राजकीय व्यवस्था किती पोखरली गेली याचे वास्तव दर्शन होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा