विदर्भातील प्रमुख पक्ष तसे दोनच, एक भाजप व दुसरा काँग्रेस. या दोघांच्या मित्र यादीत असलेले बाकी सारे विजयासाठी या दोघांवर अवलंबून असणारे. त्यामुळे ‘वज्रमूठ’ यशस्वी करून दाखवण्याचा सारा भार काँग्रेसवर होता. त्यात हा पक्ष चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला, पण पुढे काय? यामुळे या पक्षातील नेते व कार्यकर्त्यांत आलेले शैथिल्य संपेल काय? निराशा झटकून तो उभारी घेऊ शकेल काय? वारशाने लागलेले गटबाजीचे ग्रहण संपेल काय? जिंकण्यासाठी आवश्यक असलेली विजिगीषू वृत्ती भिनेल काय? नेते दरबारी राजकारणाचा त्याग करत संपत्तीचे ओंगळ प्रदर्शन टाळतील काय? सामान्य मतदारांना नेमका कशाचा तिटकारा येतो व ते नेमके कशामुळे विश्वास टाकू लागतात याचे भान नेत्यांना येईल काय? घराणेशाही त्यागायची का? यासारख्या अनेक प्रश्नांवर चर्चा व्हायला हवी. दुर्दैव हे की हा पक्ष अशा अंतर्गत मूल्यमापनाच्या भानगडीत कधी पडत नाही. नेते सुद्धा चिंतन, प्रबोधन या शब्दापासून दूर पळतात. गांधी कुटुंब काय करणार याकडे तेवढे लक्ष ठेवून असायचे. बाकी कशाचाही विचार करायचा नाही हे साऱ्यांचे सूत्र. त्यामुळेच पक्षाची पार वाताहत झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा