निषेध! निषेध! निषेध! डॉ. अक्षयकुमार काळे यांचा तीव्र निषेध. अहो, असाल तुम्ही थोर समीक्षक, लिहिले असतील तुम्ही अनेक ग्रंथ, झाले असाल साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. म्हणून काय तुम्ही कुणाच्या पेहरावावर भाष्य कराल? नाही काळे नाही, नागपूरचे सारस्वतांचे वर्तुळ हे अजिबात खपवून घेणार नाही. तुम्हाला ठाऊक आहे मनीषा अतुल कोण आहेत? जागतिक कीर्तीच्या कवयित्री, आधुनिक व परखड कवितेच्या जनक आहेत त्या. त्यांच्या कीर्तीची महती जाणून न घेता त्यांच्या संपादन कौशल्यावर भाष्य करण्याची हिंमत कशी झाली तुमची? बोलावले साहित्य संघाने म्हणून निघाले तुम्ही लगोलग, तेही ‘योग्य’ पेहराव करून. ही सवय बदला आता. तो संघ केव्हाच उजव्यांच्या ताब्यात गेलाय. त्यामुळे ‘त्या’ नामधारी अध्यक्षांच्या विनवणीला भविष्यात तरी भुलू नका. अहो, तुम्ही काही झाले तरी जुन्या काळातले प्राध्यापक. शिकवता शिकवता तुम्ही लिहिते झाले. आस्वादक समीक्षा करते झाले. तुम्ही ज्या महनियांचा अभ्यास केला ते सारे प्राचीन. आताच्या पिढीसाठी विस्मृतीत गेलेले. तुमचा नव्या पिढीशी, त्यातल्या लिहित्यांशी संबंध काय? लिहिण्यासोबत ‘दिसणेही’ तेवढेच महत्त्वाचे असा प्रागतिक विचार करणारी ही पिढी. त्यातले कवी, लेखक तुम्हाला कसे कळणार? मग जे ठाऊक नाही त्यात सहभागी व्हायचेच कशाला?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा