सत्ता, त्यातून मिळालेले अधिकार, संपत्ती, सर्व बाबतीतील सुबत्ता हे सारे वैभव एकत्र नांदणाऱ्या घरातील महिला सबला असतात का? या सुबत्ततेतून त्यांच्या स्वातंत्र्याच्या कक्षा खरोखर रुंदावतात का? घरात आणि बाहेर वावरताना त्यांना समानतेची वागणूक मिळते का? अशा सुबत्तेमुळे समाजात सुशिक्षित व संस्कारित असा मान मिळालेले या घरांमधील पुरुष महिलांना आदर व सन्मानाची वागणूक देतात का? त्यांच्या वागणुकीत घरात व सार्वजनिक जीवनात समानता दिसते का? दिसत नसेल तर ते समाजात मुखवटे घालून वावरतात असे समजायचे काय? पती हयात असेपर्यंत सबला, एकदा तो गेला की अबला हे सर्वार्थाने दृढ सामाजिक समीकरण या घरांनाही लागू पडते काय? सारी सुखे पायाशी लोळण घालत असूनसुद्धा केवळ पतीनिधन हा एकच मुद्दा एखाद्या स्त्रीला अबला करून टाकतो हे वास्तव या मोठ्या घरांमध्येही आढळते काय? असेल तर समृद्धी, उन्नती व्यक्तीला अधिक परिपूर्ण बनवते, प्रत्येकाकडे न्याय नजरेने बघण्याची सवय देते हे खरे कसे मानायचे? हे सारे प्रश्न उपस्थित झालेत ते प्रिया फुके यांच्या एका तक्रारीमुळे. त्यावर काय कारवाई करायची ते पोलीस बघतील. त्या तक्रारीत तथ्य किती हेही यथावकाश समोर येईल. कोण खरे व कोण खोटे हे सुद्धा समाजाला दिसेल पण प्रश्न असा आहे की अशी वेळ प्रियावर का यावी?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा