पराभव कोणत्याही क्षेत्रात पदरी पडलेला असो, तो जिव्हारी लागतोच. अनेकांच्या आयुष्यात हे दु:ख दीर्घकाळ राहते. यातून काहीजण पार खचून जातात तर काही पुन्हा जिद्दीने उभे ठाकतात. राजकीय क्षेत्रात तर पराभव विसरून पुन्हा जोमाने कामाला लागणे केव्हाही उत्तम. काँग्रेसचे नेते मात्र याला कायम अपवाद ठरत आले आहेत. सतत पराभव स्वीकारावा लागूनही ते मरगळ झटकणे तर सोडाच पण साधा बोध घ्यायला तयार नाहीत. ते कसे हे समजून घ्यायचे असेल तर भंडाऱ्यात जे नुकतेच घडले त्याची उजळणी करायला हवी. राज्यात सध्या दोनच जिल्हा परिषदांमध्ये लोकप्रतिनिधींची सत्ता आहे. भंडारा व गोंदियात. बाकी सर्व ठिकाणची सत्ता प्रशासकाच्या हाती म्हणजे थेट राज्य सरकारच्या नियंत्रणात. त्यातल्या भंडाऱ्यात नुकतीच अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली व त्यात काँग्रेसच्या कविता उईके विजयी झाल्या. बाजूच्या गोंदियात अपेक्षेप्रमाणे भाजपने बाजी मारली. मग हे भंडाऱ्यात का घडू शकले नाही? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे भंडाऱ्याचे. त्यांच्यामुळे ही विजयाची माळ पक्षाच्या गळ्यात पडली असा अनेकांचा समज होऊ शकतो पण तो साफ चूक आहे. या विजयाचे खरे शिल्पकार आहेत ते आदिवासींच्या हक्कासाठी लढणाऱ्या ‘आफ्रोट’ या संघटनेचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र मरसकोल्हे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा