राज्यकर्त्यांकडून सामान्य माणसांची होणारी फसवणूक ही नवलाईची बाब राहिली नाही. दिलेली आश्वासने न पाळणे, पाळली तरी त्यातून सामान्यांच्या पदरात फारसे न पडणे हे नित्याचेच. आश्वासने खोटी ठरली तरी तसे मानायला राज्यकर्ते तयार नसतात. असा प्रामाणिकपणा दाखवला तर जनता सत्तेवरून पायउतार करेल अशी भीती त्यांच्या मनात असते. म्हणून ते आश्वासन खरे ठरले असे सतत खोटे सांगतात. दुसरीकडे बहुसंख्य जनता या खोट्याला भुलते, कधी लक्षात आले तरी माफ करते पण राज्यकर्त्यांना मतांच्या माध्यमातून मदत करत राहते. हे ठाऊक असल्यानेच ते खोटे बोलण्यास धजावतात. अशा आश्वासनपूर्तीच्या माध्यमातून स्वत:चे अथवा समर्थकांचे भले करून घेण्याचे धाडस येते ते या खोटेपणातूनच. हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे नागपुरातील पाणीपुरवठ्याचे खाजगीकरण. सरकारी यंत्रणेवरचा ताण कमी व्हावा, भ्रष्टाचाराला वाव नसावा, लोकांना दर्जेदार सेवा मिळावी यासाठी देशाने हे धोरण स्वीकारले. अनेक ठिकाणी त्याचा फायदाही झाला. पण, पाण्याच्या बाबतीत नागपूरकर कमनशिबी ठरले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा