उपराजधानी असे बिरुद मिरवणाऱ्या नागपूरचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे निर्विवाद लोकप्रिय नेते आहेत हे मान्य. स्पष्ट आणि परखड मते मांडण्यात त्यांचा हातखंडा. त्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेत सतत भर पडत असते. तसे पाहू गेले तर लोकप्रियता व कार्यक्षमता हे दोन्ही भिन्न मुद्दे. गडकरींमध्ये या दोहोंचा संगम झालाय अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली त्यालाही बराच काळ लोटला. अनेकदा त्यांनी हे सिद्धही करून दाखवले. मात्र अलीकडे त्यांच्या कार्यक्षमतेवर शंका घ्याव्यात अशा घटना वारंवार घडताहेत. कोणत्याही मंत्र्यांची कार्यक्षमता त्याला मिळालेले खाते तो कसे सांभाळतो यावर अवलंबून असते. ही व्याख्या गृहीत धरली तर ही शंका आणखी गडद होते. तर झाले असे की त्यांच्या खात्यामार्फत बांधलेला पारडीचा उड्डाणपूल उद्घाटन झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी खचला. अलीकडच्या दीड महिन्यातील ही दुसरी घटना. त्याआधी बुटीबोरीच्या उड्डाणपुलाच्या बाबतीतही हेच घडले. हा पूल तीन वर्षांपूर्वीचा. म्हणजे फारच कमी वयाचा. त्यामुळे गडकरींच्या खात्याला झाले तरी काय? पुलांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होते आहे का? असे असेल तर त्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी नेमकी कुणाची? ती नीट पार पाडली जात नसेल तर मंत्रालय नेमके करते काय? कुणावर कारवाई का होत नाही? बांधकाम सुरू असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी नेमके करतात काय? बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर अंकेक्षण होते की नाही? होत असेल तर त्यातले निकृष्टपण लक्षात कसे येत नाही? ते येऊनही त्याकडे डोळेझाक केली जाते का? यासारखे अनेक प्रश्न आता उपस्थित झालेले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा