राजकारणात प्रदेश व जातींचा विचार करणे ही प्रथा तशी जुनी. ज्यांचा प्रदेश प्रगत त्यांनी मागास भागांवर तर ज्यांची जातसंख्या जास्त त्यांनी संख्येने कमी असलेल्या जातींवर वर्चस्व गाजवणे हे या प्रथेचे ढोबळ स्वरूप. अनेकदा हे वर्चस्व मागास व अल्पसंख्य जातींवर अन्याय करणारे ठरते. यातून मग वेगवेगळ्या जातसमूहांचे नेतृत्व करत पक्ष काढण्याची पद्धत सुरू झाली. त्याला किती यश मिळाले हा या लेखाचा विषय नाही. मात्र प्रदेश व जात या दोन्ही पातळीवर महाराष्ट्रातील राजकारण्यांनी विदर्भावर कसा अन्याय केला याचा तपशील बघितला तर अनेक रंजक गोष्टी समोर येतात. हा तपशील आताच तपासण्याचे कारण सध्या आरक्षणाच्या मुद्यावरून ओबीसी व मराठ्यांमध्ये निर्माण झालेला तणाव. याचे स्वरूप विदर्भात तेवढे तीव्र नाही पण त्याच्या झळा मात्र राज्याच्या राजकारणात सक्रिय असलेल्या देवेंद्र फडणवीसांसारख्यांना बसू लागल्यात म्हणून हा प्रपंच. त्यावर चर्चा करण्याआधी इतिहासात डोकावणे इष्ट.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा