विश्वासार्हता संपली की सामान्य जनता कशी पाठ फिरवते याचे उत्तम उदाहरण म्हणून राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याकडे पाहायला हवे. मोठा गाजावाजा करून ते आले. तेही त्यांना आवडणारा रेल्वेचा प्रवास करून. सलग पाच ते सहा दिवस ते फिरले. गोंदियापासून बुलढाण्यापर्यंत. या संपूर्ण काळात त्यांनी केवळ एक जाहीर सभा घेण्याचे धाडस केले. तेही यवतमाळातील वणीत. तिथे राजू उंबरकर सारखा जनसामान्यात लोकप्रिय असलेला नेता पक्षात आहे म्हणून. अन्य ठिकाणी केवळ पदाधिकाऱ्यांच्या बैठका व त्यात खास ठाकरे शैलीत दिलेल्या कानपिचक्या एवढेच त्यांच्या दौऱ्याचे स्वरूप राहिले. ही अशी अवस्था मनसेवर का ओढवली याचा विचार करण्याआधी जरा इतिहासात डोकवायला हवे. ठाकरेंनी जेव्हा शिवसेनेशी फारकत घेत पक्ष स्थापन केला तेव्हा त्यांनी केलेला विदर्भ दौरा आठवा. त्यांच्या ठिकठिकाणच्या सभांनी तेव्हा गर्दीचे सारे उच्चांक मोडलेले. मराठी माणसांवर, तरुणांवर होणारा अन्याय ही त्यांची सुरुवात होती. हा माणूस जे बोलतो त्यात सच्चेपणा आहे, तरुणांविषयी कळकळ आहे. त्यांच्यासाठी काही तरी करण्याची इच्छाशक्ती आहे या भावनेतून तरुणांच्या झुंडी त्यांच्या पाठीशी उभ्या ठाकल्या. भलेही तेव्हा त्यांना विदर्भात यश मिळाले नसेल पण शिवसेना तसेच इतर प्रस्थापित पक्षांना कंटाळलेला एक मोठा वर्ग त्यांच्या पाठीशी उभा राहिला. त्याचा अचूक फायदा त्यांना घेता आला नाही. याची कारणे दोन. त्यातले पहिले विदर्भातील पक्षाचे दैनंदिन कामकाज मुंबईतून नियंत्रित करण्याची वृत्ती. जी चूक शिवसेनेने केली तीच यांनी केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा