गटबाजी हा काँग्रेसला जडलेला असाध्य आजार आहे. अगदी कर्करोगासारखा. तो जसा उपचारानंतर बरा झाल्यासारखा वाटतो व नंतर पुन्हा उफाळून येतो तसा. हा पक्ष जेव्हा सतत पराभव स्वीकारत असतो तेव्हा गटबाजी दिसून येत नाही. एकदा का विजय मिळवणे सुरू झाले की पक्षातील नेत्यांना गटतटाचे राजकारण करण्यासाठी जणू ऊर्जाच प्राप्त होते. यातून अनेकदा विजयाचा घास हिरावला जातो पण त्याचे कुणाला सोयरसुतक नसते. स्वत:चा, पक्षाचा पराभव झाला तरी बेहत्तर पण समोरच्या स्वपक्षीयाला त्याची जागा दाखवणारच असा पण यात रमणारा प्रत्येकजण करत असतो. हेच नेते जेव्हा भाजपसारख्या तुलनेने शिस्तबद्ध पक्षात जातात तेव्हा गटबाजी विसरतात व सूतासारखे सरळ वागायला लागतात. समजा परत पक्षात आले की त्यांचा मूळ स्वभाव उफाळून येतो. अशी अनेक उदाहरणे देता येतील. अर्थात ती द्यायची गरजच भासणार नाही इतके ताजे उदाहरण सध्या चर्चेत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा