वर्धा : सर्वाेदय संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आरोपी सुनील केदार यांची नियुक्ती म्हणजे गांधी विचांराची हत्याच होय, असा घणाघात महादेव विद्रोही यांनी केला आहे.

गांधीवादी संस्थांची शिखर संस्था असलेल्या सर्व सेवा संघावर प्रभुत्व ठेवण्यासाठी चंदनपाल-काकडे व महादेव विद्रोही-खैरकार या दोन गटात गत एक वर्षापासून चांगलीच जुंपली आहे. त्यातच चंदनपाल गटाने काही महिन्यांपूर्वी झालेल्या अधिवेशनात बहुमताने सर्व सेवा संघावर ताबा मिळवला. यानंतर विरोधी विद्रोही गटाने चंदनपाल गटावर सातत्याने आरोपांचे आसूड ओढणे सुरू केले आहे.

controversial statements by bjp union minister
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानांमुळे वाद; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश गोपी यांची सारवासारव
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
supporters of former mla Prakash Awade attempted to break into Abhishek Spinning Mill over financial embezzlement
आर्थिक व्यवहारातून आवाडेंचा सूतगिरणी चालकांसोबत वाद
Chemicals are now used to eliminate mosquitoes in vasai
वसई : डास निर्मूलनासाठी आता रसायनाचा वापर, डासांचा प्रभाव असलेली ९९ ठिकाणी निश्चित
Shiv Sena Shinde group strategizes for party growth before upcoming Pune Municipal Corporation elections
पुण्यावर शिंदे गटाचा ‘आवाज’ वाढणार
Ganesh Naik announcement create unease in Shiv Sena
ठाण्यात फक्त कमळ ! गणेश नाईकांच्या घोषणेने शिवसेनेत अस्वस्थता
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Sanjay Raut On BJP
Sanjay Raut : “लक्षात घ्या, राजकारणात सर्वांचे दिवस येतात”, संजय राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना मोठा इशारा

हेही वाचा – राज्यात ८६ हजार वीज कर्मचाऱ्यांच्या वाढीव पेन्शनचा घोळ, कंपनी अर्ज भरण्याचा पर्याय कधी देणार

चंदनपाल अध्यक्ष असलेल्या सर्व सेवा संघाच्या सर्वाेदय समाज राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन १४ ते १६ मार्चदरम्यान सेवाग्राम आश्रम परिसरात होत आहे. त्याच्या स्वागताध्यक्षपदावर माजी मंत्री सुनील केदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीवर महादेव विद्रोही यांनी जोरदार टीका करत नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – “..आणि सोनाली कुलकर्णी पुन्हा एकदा प्रेमात”

केदार यांना न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. सध्या ते जामिनावर बाहेर आहे. काेट्यवधी रुपयांच्या बँक घोटाळ्यात ते आरोपी आहे. अशी व्यक्ती गांधीवादी संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी असणे म्हणजे गांधी विचारांची हत्याच होय. देव त्यांना सदबुद्धी देवो, अशी भावना विद्रोही यांनी महादेव व्यक्त केली.

Story img Loader