वर्धा : ओबीसी, विजेएनटी तसेच एसबीसी घटकातील अकरावीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाज्योतीतर्फे जेईई तसेच नीट परीक्षेच्या तयारीसाठी प्रशिक्षण दिल्या जाते. सोबतच मोफत टॅब व सहा जीबी इंटरनेट डाटा मोफत मिळतो. मात्र त्यासाठी मुदत असते.

महाज्योतीने दहावीची परीक्षा सुरू असतानाच या दीड वर्षाच्या प्रशिक्षणाची नोंदणी मार्च महिन्यात सुरू केली होती. पुढे उत्तीर्ण होणार का, किती गुण मिळतील, अकरावीत प्रवेश मिळणार की नाही असा संभ्रम असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी नोंदणी केलीच नव्हती. त्याच वेळी महाज्योतीचे माजी संचालक प्रा. दिवाकर गमे यांनी दहावीचा निकाल लागल्यानंतरच नोंदणी सुरू करण्याची मागणी केली होती. पण ती एप्रिलमध्येच बंद झाल्याने आज अनेकांना वंचित राहण्याची आपत्ती आहे.

students allowed to fill out scholarship applications offline
शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना ऑफलाइन अर्ज भरण्याची मुभा… काय आहे निर्णय?
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Nagpur High Court , academic loss, student,
विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी न्यायालयाने नियमांपलिकडे…
foreign scholarship
परदेशी जाण्यासाठी दिली खोटी माहिती, शिष्यवृत्तीसाठी झालेली निवडच रद्द!
no decision from maha government on mahajyoti withdraw from uniform policy process
‘समान धोरण’मुळे लाखो विद्यार्थी वंचित; ‘महाज्योती’ बाहेर पडल्यानंतर सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा
transfers in states forensic scientific laboratories are frequently deferred
नागपूर : शासकीय सेवांमधील बदल्या रखडल्या; ‘या’ विभागात नियमांची पायमल्ली!
Kerala Ban On Digital Notes
Kerala Ban On Digital Notes : आता पालकांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर येणार नाही मुलांचा गृहपाठ, डिजिटल स्वरुपातील नोट्सवर बंदी; ‘या’ राज्याने घेतला निर्णय!
Student Support Committee Pune  organization working for needy students
स्कॉलरशिप फेलोशिप: ‘विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे’; गरजू विद्यार्थ्यांचा पुण्यातला हक्काचा आधारवड

हेही वाचा – पोटच्या मुलीवर बलात्काराचा आरोप असूनही वडिलाची निर्दोष सुटका, कारण पत्नीने न्यायालयात सांगितले की…

आता निकाल लागल्यावर नव्वद टक्क्यांवर गुण प्राप्त करणारे विद्यार्थीपण नोंदणी न केल्याने या मोफत प्रशिक्षणापासून वंचित राहण्याची आपत्ती आहे. निराश विद्यार्थ्यांची मनस्थिती पाहून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांची भेट घेवून मुदतवाढ न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला. मागणी मान्य करीत पुढील सात दिवसांची मुदत वाढवून देण्यात आल्याची माहिती प्रा. गमे यांनी दिली आहे. आता अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांनी त्वरित नोंदणी करीत या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आहे.