नागपूर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षांना ११ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. कॉपीमुक्त अभियानासाठी यंदा प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथक तैनात केले आहे. त्यामुळे गैरप्रकार रोखण्यात मोठे यश मिळत आहे. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण मंडळाच्या वतीने ४४ भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. यंदा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पाच भरारी पथके आहेत. याशिवाय कॉपीमुक्त अभियानासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील महसुली विभागाचे भरारी पथकही प्रत्येक परीक्षा केंद्रांवर नजर ठेवून आहेत. त्यामुळे गैरप्रकाराला आळा बसत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे परीक्षा दरम्यान एका तोतया उमेदवारांना पकडण्यात भरारी पथकाला यश आलेले आहे. शिक्षण विभागाच्या भरारी पथकाने बारावीच्या परीक्षेदरम्यान कारवाई करत एका तोतया परीक्षार्थीला रंगेहात पकडले आहे. या घटनेमुळे परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत शिक्षण विभागाने कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला आहे. तोतया परीक्षार्थींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा