‘केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष असतांना त्यांनी मला तिकिट दिले होते. त्यांच्यामुळे मी आमदार झालो, त्यामुळेच आज कृषिमंत्री म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे,’ असे वक्तव्य कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे जाहीर आभार मानले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिवार फेरीच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. पुढे धनंजय मुंडे म्हणाले, स्व.गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांचा मोठा प्रभाव माझ्या राजकीय जीवनावर राहिला आहे.

हेही वाचा >>> केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा सरकारला घरचा आहेर, ‘महात्मा गांधी म्हणत गावाकडे चला अन् आता…’

Anajli Damania on dhananjay Munde
“…आता धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्याच”, भर पत्रकार परिषदेत पुरावे सादर केल्यानंतर अंजली दमानियांची मागणी!
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : सुरेश धस सगळा हिशेब मांडत म्हणाले, “धनंजय मुंडे पालकमंत्री असताना ७३ कोटी…”
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Chandrakant Patil on Dhananjay Munde
Chandrakant Patil: “… तर मुख्यमंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील”, चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…

नितीन गडकरी यांच्यासमोर भाषण करण्याची संधी १०-१२ वर्षानंतर मिळाली. प्रदेशाध्यक्ष असतांना नितीन गडकरी यांनी मला उमेदवारी दिली नसती तर मी मंत्री, आमदार नसतो. आज मंत्री म्हणून तुमच्या समोर नितीन गडकरींमुळे बोलतोय. देशात आता विमानाने किंवा हेलिकॉप्टरने फिरण्यापेक्षा वाहनाने फिरायला मजा वाटते. नितीन गडकरींच्या मंत्रालयाने तयार केलेले सुरेख रस्ते त्यामागचे कारण आहे. लोकसभा निवडणुकीला आणखी बराच अवकाश आहे. त्यामुळे आताही कृषी मंत्रालयाची जबाबदारी नितीन गडकरींनी घेतल्यास शेतकऱ्यांच्या जीवनात मोठे बदल निश्चित घडून येतील, असा विश्वासही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.

Story img Loader