महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा आज विधानसभेत उपस्थित करण्यात आला. राज्य सरकारने अद्यापही कर्नाटक सरकारविरोधात ठराव मांडला नसल्याने विरोधकांनी टीका केली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सर्वात प्रथम भाष्य करत आज ठराव मांडायला हवा होता असं सांगितलं. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज किंवा उद्या ठराव मांडला जाईल अशी माहिती दिली. यावेळी त्यांनी भास्कर जाधवांच्या टीकेला उत्तर देताना आमची मान झुकवण्याची ताकद कोणाच्याही बापामध्ये नाही असं म्हटलं.

अजित पवारांनी मांडला ठरावाचा मुद्दा

“कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. आज ठरावा यायला हवा होता. ते आपल्याला डिवचतात आणि आपण शांत बसतो. आपणही त्यांना जशास तसं उत्तर दिलं पाहिजे असं सर्वांचं मत आहे. सर्व मराठी भाषिकांना ही भूमिका समजली पाहिजे. आम्ही सातत्याने भूमिका मांडत असताना त्याला बगल देण्याचा प्रयत्न होत आहे,” असं अजित पवार म्हणाले.

ajit pawar sanjay gaikwad rahul gandhi
Ajit Pawar in Pune: अजित पवारांच्या संजय गायकवाडांना कानपिचक्या; राहुल गांधींबाबतच्या ‘त्या’ विधानावर म्हणाले, “जे चुकीचं वागतील…”
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Lalbaugcha raja 2024 darshan mumbai devotees get pushed shoved at lalbaugcha raja amid stampede like situation
लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाताय? ‘हा’ VIDEO पाहा अन् तुम्हीच सांगा चूक भाविकांची की कार्यकर्त्यांची?
girish mahajan harshvardhan patil
Girish Mahajan: “देवेंद्र फडणवीस स्वत: त्यांच्या संपर्कात आहेत”, हर्षवर्धन पाटलांच्या पक्षांतराच्या चर्चांवर गिरीश महाजनांनी मांडली भूमिका!
Ganpati powerful stotram and mantras
Ganesh Chaturthi 2024 : फक्त मोदक आणि दूर्वाच नाही ‘हे’ प्रभावी स्तोत्र आणि मंत्रही आहेत बाप्पाला प्रिय; नियमित पठण केल्यास बाप्पा देईल भरपूर आशीर्वाद
29th August Panchang & Rashi Bhavishya
२९ ऑगस्ट पंचांग: गुरुवारी सिंह, मिथुनसह ‘या’ राशींना होणार लाभ! गुंतवणुकीतून फायदा तर व्यापारासाठी मिळेल नवा भागीदार; वाचा तुमचं राशीभविष्य
Ganesh Chaturthi 2024 Quiz
Ganesh Chaturthi 2024: आपल्या लाडक्या गणपती बाप्पांविषयी तुम्हाला किती माहिती आहे? या प्रश्नांची उत्तरं द्या आणि बक्षीस जिंका!
amruta fadnavis on nanakram nebhnani gunfor women
Amruta Fadnavis on Women Safety: “दोन-चार चांगली माणसं मारली गेली तरी चालेल, पण..”, शिंदे गटाच्या नेत्याच्या विधानावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाल्या…

बघ्याची भूमिका घेऊ नका – पृथ्वीराज चव्हाण

यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलण्यास उभे राहिले होते. “महाराष्ट्र शासनानं हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात २००४ साली दाखल केला आहे. कर्नाटकचा त्यावर प्रतिदावा आहे. राजकीय दृष्टीने वादग्रस्त वक्तव्यं करुन प्रकरण चिघळण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. गृहमंत्र्यांकडे हा विषय न्यावा अशी माझी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे. जाणुनबुजून परिस्थिती चिघळण्याचा प्रयत्न सुरु आहे. आपण फक्त बघ्याची भूमिका घेता कामा नये. सर्व मराठी भाषिक आपल्याकडे आशेने पाहत आहेत. बघ्याची भूमिका घेऊन आपण त्याला काही उत्तर देत नाही हे बरोबर नाही. कर्नाटकला गंभीर इशारा दिला पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.

यानंतर देवेंद्र फडणवीस उभे राहिले असता विरोधकांकडून गदारोळ करण्यात आला. मांडलेला विषय महत्त्वाचा आहे असून यावर सभागृह एकजूट आहे. या विषयावर वातावरण बिघडवू नये असं आवाहन करत त्यांनी अध्यक्षांना भास्कर जाधव यांना बोलू देण्याची विनंती केली.

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मान खाली घालून गप्प आहेत”

“सीमाभागात मराठी बांधवांवर अत्याचार होत असून दडपशाहीने वागवंल जात आहे. यापेक्षा महत्त्वाचं काम काय असणार. सरकारने बाकीचं कामकाज बाजूला सारुन मराठी बांधवांवरील अन्यायाला वाचा फोडावी आणि संपूर्ण महाराष्ट्र मराठी बांधवांच्या पाठीशी आहे हे कर्नाटकला दाखवलं पाहिजे. अमित शाह यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना बोलावून घेतलं आणि संयम पाळण्यास सांगितलं होतं. पण आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मान खाली घालून गप्प आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री वाटेल ते बोलतात, हे आपण उघङड्या डोळ्याने पाहायचं का?,” अशी विचारणा भास्कर जाधव यांनी केली.

“…कोणाच्या बापात हिंमत नाही”

यानंतर देवेंद्र फडणवीस उत्तर देण्यासाठी उभे राहिले. “या मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला मान खाली घालावी लावेल अशी कोणाच्या बापाची हिंमत नाही. जसं ते म्हणतात तसं आपणही इंच इंच लढू. केंद्रात, सर्वोच्च न्यायालयात आपण मराठी बांधवांवरील अन्याय दूर करण्यासाठी हवं ते करु,” असं फडणवीस म्हणाले.

“मागील आठवड्यातील वातवारण गंभीर असल्याने ठराव येऊ शकला नाही. आज ठराव येणार होता, पण मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकारकडून कार्यक्रमाचं निमंत्रण आलं होत. त्यासाठी जाणं महत्त्वाचं होतं. ते दुपारी येणार आहेत. ते आल्यानंतर आज किंवा उद्या ठराव मांडू. यासंदर्भात तसूभरही महाराष्ट्राचं सरकार मागे हटणार नाही,” असं आश्वासन त्यांनी विरोधकांना दिलं.