नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने येथे दाखल झालेल्या आमदार-अधिकारी आणि कार्यकर्त्यांची हॉटेल उद्योग आणि विमान कंपन्यांकडून लूट केली जात आहे. हॉटेलचालकांनी भाडयात मोठी वाढ केली असून त्याचा फटका लोकप्रतिनिधींनाही बसला आहे. ही लूट थांबवण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलण्याची मागणी विधानसभेत करण्यात आली.

अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूरमध्ये सध्या अति महत्त्वाच्या व्यक्तींचा  मोठा राबता आहे. मंत्री, अधिकारी सरकारी निवासस्थानात राहत असले तरी बहुतांश आमदारांचे वास्तव्य आलिशान हॉटेल्समध्ये आहे. आमदारांचे स्वीय साहाय्यक, कार्यकर्तेही हॉटेलमध्ये राहत आहेत. शहरातील सर्व हॉटेल्स भरलेली आहेत.

Prakash Solanke Majalgaon, Prakash Solanke latest news,
प्रकाश सोळंकेंच्या माजलगावमध्ये ‘तुतारी’ चा आवाज वाढला
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला…
The application deadline for Ladki Bahin Yojana ends today Print politics news
‘लाडक्या बहिणीं’ची बँकांमध्ये झुंबड; आज अखेरचा दिवस, बँक खात्याशी आधार कार्ड जोडणीसाठी महिलांची गर्दी
Loksatta anvyarth Baba Siddiqui shot and killed Law and order
अन्वयार्थ: कायदा आणि कुव्यवस्था?
Jayant Patil, Jayant Patil news, Jayant Patil latest news,
जयंत पाटील यांना घेरण्याचे विरोधकांबरोबरच मित्रपक्षांचेही प्रयत्न
indefinite satyagraha protest in front of palghar collectorate
श्रमजीवी सत्याग्रहातील कोंडी फुटेना; सुमारे आठ हजार नागरिकांचा सहाव्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या
pmc form committee to investigate 30 illegal shops build in parihar chowk in aundh
‘त्या’ बेकायदा गाळ्यांवर वरदहस्त कोणाचा? आयुक्तांनी नेमली चौकशी समिती
Clashes between former MPs during the inauguration of Tasgaon Municipality building
तासगाव पालिका इमारत उद्घाटनावेळी आजी- माजी खासदारांमध्ये खडाजंगी

हेही वाचा >>> सरकारसोबत चर्चा निष्फळ, सरकारी कर्मचारी गुरूवारपासून संपावर

आलिशान हॉटेलमध्ये एरवी आठ ते १० हजार रुपये प्रतिदिन भाडयाने मिळणाऱ्या खोलीचे भाडे आता ३० ते ४० हजार रुपयांच्या घरात गेले आहे. तर विमानाचे भाडेही पाच ते सात हजार रुपयांवरून २० ते २५ हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. विधानसभेत काँग्रेसचे अमिन पटेल यांनी औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे हॉटेल आणि विमान कंपन्यांकडून होणाऱ्या लुटीचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला.  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही विमान प्रवासाच्या दराचा मुद्दा या वेळी उपस्थित केला. पूर्वी विमानाच्या तिकीट दरावर मर्यादा होती. दुपटीपेक्षा जास्त तिकीट दर आकारू नये असा नियम होता. मात्र केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाने ही मर्यादा काढून टाकली. त्यामुळे विमान कंपन्या अधिवेशनकाळात २० हजार आणि त्यापेक्षाही अधिक तिकीट दर आकारतात. याबाबत सरकारने केंद्र सरकारशी विमान संपर्क साधला पाहिजे, अशी मागणी चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली. त्यावर सामान्य प्रशासन विभागाने याबाबत पूर्ण माहिती घेऊन संबंधित हॉटेल आणि विमान कंपन्यांशी चर्चा करून हा प्रश्न कसा सोडवता येईल हे पाहण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.