नागपूर : महाराष्ट्रात गेल्या नऊ महिन्यात तब्बल आठ वाघांच्या बछड्यांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर ही माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षातील हे सर्वाधिक मृत्यू आहेत. चंद्रपूर आणि नागपूर वनविभागातील हे मृत्यू आहेत. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, भारतीय वन्यजीव संस्था आणि वनविभागाने केलेल्या व्याघ्रगणनेत भारतातील वाघांची संख्या वाढली आहे.

हेही वाचा >>> दरोड्यापूर्वीच पाच संशयित जाळ्यात; धरणगावातील गस्ती पथकाची कारवाई

Inflation in food prices hit a nine month high of 5 5 percent
खाद्यान्नांच्या किमतीतील भडक्याने कहर; किरकोळ महागाई साडेपाच टक्क्यांच्या नऊमाही उच्चांकाला
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
tigers existence in sahyadri belt
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यात आठ वाघांचे अस्तित्व
Vegetables expensive due to decline in quality despite increase in income
नवी मुंबई : आवक वाढूनही दर्जा खालावल्याने भाज्या महाग
dengue-malaria in Bhayander number of patients quadrupled within a month
पिंपरीत डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ; १७,५०० घरांमध्ये सापडल्या अळ्या
Territorial Battles Lead to t9 Tiger Deaths in Nagzira Reserve
विश्लेषण : वर्चस्वाची लढाई नागझिऱ्यातील वाघांसाठी धोकादायक?
66 people died in floods in Nepal
नेपाळमधील पुरात ६६ जणांचा मृत्यू, ७९ बेपत्ता
Sudhir Mungantiwar, tigers, forest,
मुनगंटीवार म्हणतात, जंगलातील वाघांना स्थलांतरित करा..

महाराष्ट्रातही ४४४ वाघ असल्याचे या आकडेवारीतून समोर आले आहे. मात्र, याचवेळी राज्यात गेल्या चार वर्षात वाघांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यात वाघांच्या बछड्यांच्या मृत्यूची आकडेवारी धक्कादायक आहे. या आठ बछड्यांपैकी पाच बछड्यांचा मृत्यू हे सप्टेंबर महिन्यातील आहेत. यात चंद्रपूरच्या चार, ब्रम्हपूरीच्या एक आणि पेंच व्याघ्रप्रकल्पातील तीन बछड्यांचा समावेश आहे. साधारणपणे बछड्यांच्या मृत्युमागे नैसर्गिक कारण अधिक असले तरीही यात वाघिणीपासून दूरावल्याने हे बछडे मृत पावले आहेत. चंद्रपूर व पेंचमधील वाघांच्या बछड्यांच्या मृत्युमागेही नेमके हेच कारण आहे. अजूनही या बछड्यांच्या आईचा शोध लागलेला नाही.