एका कराराच्या भरवशावर महाराष्ट्रात सामील झालेला विदर्भ प्रदेश तसा मोठा. स्वतंत्र राज्य होऊ शकेल अशी क्षमता असलेला. त्यामुळे प्रादेशिक पक्ष फुलण्याला येथे भरपूर वाव. राष्ट्रीय पक्षांच्या दादागिरीला वा दुर्लक्षाला कंटाळून असे पक्ष स्थापण्याचे अनेक प्रयत्न विदर्भात झाले. त्यांना यश किती मिळाले व अपयशाचे धनी का व्हावे लागले हा आजच्या चर्चेचा विषय. त्याचे कारण नुकतेच लागलेले विधानसभेचे निकाल व त्यात या साऱ्या प्रादेशिकांची उडालेली धुळधाण. कुठलेही राज्य एक असले तर त्यात सामावलेल्या प्रदेशाची अस्मिता, भाषा, व्यवहार यात वेगळेपण असते. केवळ प्रदेशाचा विचार करत उभे राहणारे पक्ष याच बळावर मोठे होतात. हे लक्षात घेतले तर विदर्भ तशी सुपीक भूमी. तरीही हे पक्ष का तग धरू शकले नाहीत? यात नेमकी चूक कुणाची? या पक्षांचे नेतृत्व करणाऱ्यांची की त्यांच्यावर कधी विश्वास तर कधी अविश्वास टाकणाऱ्या जनतेची? यावर विचार होणे गरजेचे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा