अकोला : विरोधकांची नीच प्रवृत्ती समजून घेतली पाहिजे. त्यांनी डॉ. बाबासाहेबांना निवडणुकीत पाडले. ॲड. बाळासाहेब व भैयासाहेब यांच्या पराभवासाठी देखील कुटनीती आखली. प्रस्थापितांनी आंबेडकरी चळवळ गटातटात अडकवली, असा आरोप वंचित आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आज केला.

मूर्तिजापूर येथील वंचितचे उमेदवार डॉ. सुजात वाघमारे यांच्या प्रचारार्थ शेवटच्या टप्प्यात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी वंचितचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. सुजात आंबेडकरांनी विरोधकांचा खरपूस शब्दात समाचार घेतला.

Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
pressure politics Ajit Pawar backing Dhananjay Munde NCP Beed walmik karad
अजित पवार हे धनंजय मुंडे यांना पाठिशी का घालत आहेत ?
Mahavikas Aghadi Shiv Sena MP Supriya Sule
महाविकास आघाडीतील शिवसेना खासदार सुप्रिया सुळेंवर नाराज
Ignoring voter growth led to Assembly elections defeat Vishal Patil admits
मतदार वाढीकडे केलेले दुर्लक्ष विधानसभा निवडणुकीत भोवले; विशाल पाटील यांची कबुली
dcm eknath shinde slams sharad pawar for his statement
विरोधकांच्या टीकेला कामातून उत्तर; एकनाथ शिंदे यांचे शरद पवार यांच्यावर टीकास्त्र
congress mla vijay wadettiwar accused election commission of Acting on BJP s warnings
निवडणूक आयोग मनुवादी, भाजपच्या इशाऱ्यावर चालतो… वडेट्टीवार यांच्या वक्तव्यामुळे…
शिवसेना शिंदे गटात मोठी फूट पडणार? उदय सामंत यांच्या नावाची का होत आहे चर्चा? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : उदय सामंत हे एकनाथ शिंदेंना पर्याय ठरू शकतात का?

पुढे ते म्हणाले, आता हे विरोधक ॲड. आंबेडकरांच्या जीवावर उठले आहेत. त्यांच्या प्रकृतीवर हात घालत आहेत. निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीत भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचा सुपडा साफ करायचा आहे, हे लक्षात घ्यावे. विरोधी उमेदवार खोटी माहिती व अपप्रचार करीत आहेत. महाराष्ट्रातील जाणत्या राजांनी आंबेडकरी चळवळी विरोधात षडयंत्र रचले. ते समजून घेतले पाहिजे. आंबेडकरवादी चळवळ प्रस्थापित पक्षांना उभी राहू द्यायची नाही.

हेही वाचा >>> दक्षिण नागपूरमध्ये भाजप काँग्रेसला समानसंधी

महाराष्ट्रातील राजकारणात मराठ्यांच्या दोन खानावळी चालतात. त्यामध्ये एक शरद पवारांची, तर दुसरी एकनाथ शिंदे यांची आहे. एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीस, तर शरद पवारांनी उद्धव ठाकरे उपरे ठेवले. या दोन मराठ्यांच्या खानावळीत राजकारण सुरू असते. आंबेडकरवादी आमदार निवडून येण्याची परिस्थिती निर्माण झाली, तर ते दोन्ही एकत्र येतात. कुणाला चालवाचे ते ठरवतात. आपल्या ताटात काहीच पडू देत नाहीत. त्यामुळे हे राजकारण बंद करायचे आहे, असे सुजात आंबेडकर म्हणाले.

हेही वाचा >>> खबरदार! आता समाजमाध्यमांवर प्रचार कराल तर….

प्रस्थापितांसमोर रांग लावण्यापेक्षा स्वत:चे हक्काचे स्थान निर्माण करा. विरोधक नवीन गणिते मांडत आहेत. मतांचे विभाजन करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. मविआने लोकसभा निवडणुकीत दलित व मुस्लिमांची फसवेगिरी केली होती. आता त्यांचे गठ्ठा मतदान वंचित आघाडीकडे वळत आहे. कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या षडयंत्रात अडकू नका, असे आवाहन सुजात आंबेडकर यांनी केले. मूर्तिजापूरमध्ये आरोग्याची मोठी समस्या आहे. मूर्तिजापूर व बार्शीटाकळीत चांगले रुग्णालय नाही. रस्ते, पाणी व विजेचे प्रश्न आहेत. शाळा बंद पडत आहेत. उद्योग-व्यवसाय नसल्याने रोजगार निर्मिती नाही. विकासाचा मोठा अनुशेष मूर्तिजापूरमध्ये निर्माण झाल्याचे दिसून येते. हे सर्व चित्र पालटले पाहिजे. हे लक्षात घेऊनच मतदान करा, असे आवाहन देखील सुजात आंबेडकर यांनी केले.

Story img Loader