नागपूर : मोसमी पाऊस यंदा सरासरी पूर्ण न करताच परतला आणि राज्यात ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा सुरू झाला. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत तो अधिक होता. मात्र, आता राज्यातील वातावरणात बदल होत असून नागरिकांना लवकरच उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. कमाल तापमानात हळूहळू घट होत आहे. यामुळे राज्यात थंडीची चाहूल लागली आहे.

हेही वाचा – चंद्रपूर : रावण आमचा देव, दहणाला विरोध, आदिवासी समाजाची भूमिका; घुग्घुसमध्ये तणावाची स्थिती, दंगल नियंत्रण पथक दाखल

Ambuja Cements Maratha Limestone mine in Lakhmapur Korpana taluka will cause severe pollution affecting nearby villages
चंद्रपूर : अंबुजा सिमेंटच्या लाईमस्टोन खाणीमुळे प्रदूषणात वाढ; दहा ते पंधरा गावांना…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
All-party leaders oppose recommendation to change formula for equitable water distribution in Jayakwadi dam
जायकवाडी समन्यायी पाणी वाटपाचे सूत्र बदलण्याच्या शिफारशीच्या विरोधात सर्वपक्षीय नेते
pune water bill marathi news
पुणे : पुरवठ्या आधीच समाविष्ट गावांच्या पाणीपट्टीत वाढ ?
17 percent water loss from 65 major irrigation projects in Maharashtra state
धरणांमधील १७ टक्के पाणी वाया! कालव्यांची दुरवस्था, बाष्पीभवनाच्या वाढत्या वेगाचा परिणाम
Replantation of 2097 trees for Thane Municipal Headquarters
६३१ वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव; ठाणे महापालिका मुख्यालयासाठी २०९७ वृक्षांचे पुनर्रोपण
Nalasopara unauthorised building vasai virar municipal corporation
नालासोपाऱ्यातील अनधिकृत इमारतीवर कारवाईला सुरुवात, रहिवाशांचा आक्रोश
Loksatta Chatura Nature Change of seasons and moments of joy in the garden
निसर्गलिपी: ऋतू बदल आणि बागेतील आनंदाचे क्षण

हेही वाचा – बुलढाणा : भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक ठार, ऐन दसऱ्याला दुर्घटना

विदर्भात तापमानाचा कहर अजून कमी झाला नसला तरी पहाटे आणि रात्री गारवा जाणवू लागला आहे. पुणे शहराच्या तापमानात घट झाली. राज्यातील सर्वच शहरांचे तापमान आता कमी होऊ लागल्यामुळे राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे दाखल झाले आहेत. त्याचा परिणाम महाराष्ट्रात होणार आहे. राज्यातही काही भागांत तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊन पीक कापणीचा निर्णय घ्यावा, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. यंदा पावसाने सरासरी गाठली नाही. यामुळे थंडीचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे.

Story img Loader