‘गांधीजी ते विनोबाजी : वर्तमानाच्या परिप्रेक्षातून’वर परिसंवाद
शफी पठाण
(राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरी) वर्धा : बिल्कीस बानोवर बलात्कार करणाऱ्यांचा जाहीर सत्कार केला जातोय, शेतकरी हा शब्द आत्महत्या असाही लिहिला जाऊ शकतो, इतकी त्यांची अवस्था बिकट आहे. गांधी – विनोबांचा वैचारिक वारसा सांगणाऱ्या या देशात हे घडतेय, याचा अर्थ आज गांधी – विनोबांचे विचार कालबाहय झाले आहेत, असे परखड प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक श्रीकांत देशमुख यांनी केले. ते आज रविवारी साहित्य संमेलनात आयोजित ‘गांधीजी ते विनोबाजी : वर्तमानाच्या परिप्रेक्षातून’ या विषयावर परिसंवादात बोलत होते. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी भाजप नेते व राज्यसभेचे सदस्य विनय सहस्त्रबुद्धे तर प्रमुख वक्ते म्हणून लोकसत्ताच्या विदर्भ आवृत्तीचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे, गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री रमाकांत खलप, डॉ. प्रशांत धर्माधिकारी व भानू काळे हे होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा