लोकसत्ता टीम

बुलढाणा: मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची शनिवारी (दि. १०) रात्री दहा वाजता निर्णायक बैठक पार पडली.

photographers express displeasure over remarks made by dcm devendra fadnavis
अमरावती : देवेंद्र फडणवीस यांच्‍या ‘त्‍या’ वक्‍तव्‍यावर छायाचित्रकार नाराज, माफीची मागणी
Legislation in the current session on paper shredding
पेपरफुटीबाबतचा चालू अधिवेशनात कायदा; लोकसेवा आयोगाकडून ‘क’ वर्गाच्या जागांची भरती
Autorickshaw drivers angry in Nagpur city movement for various demands
केंद्रीय दळणवळण मंत्र्यांच्या शहरात ऑटोरिक्षा चालक संतप्त; या मागणीसाठी धरणे, निदर्शने…
Government Schemes, Government Schemes Offer Rehabilitation Path for Naxalites, Naxal, naxal movement, Devendra fadnavis, Devendra fadnavis urges for quit naxal movement, gadchiroli, gadchiroli news,
नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
Eknath shinde marathi news
येत्या दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेविरहीत होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास
Ganesh Naik
“प्रोटोकॉलनुसार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, पण देवेंद्र फडणवीसच…”, आमदार गणेश नाईक यांचं विधान; म्हणाले, “मी ओपन बोलतो”
smart prepaid meters
देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळला; नागपुरात स्मार्ट प्रीपेड मीटरच्या विरोधात विदर्भवादी आक्रमक
difference between Cabinet Minister and Minister of State salary of MP
केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या अधिकार आणि कर्तव्यात काय फरक असतो?

सोयापेंड आयात थांबविणे, पामतेल वर आयात शुल्क, कापूस दरवाढीवर लवकर निर्णय घेण्याची ग्वाही गोयल यांनी दिली. रात्री साठेआठ ते दहा या दीडतासच्या जम्बो बैठकीत सोयाबीन-कापूस प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कापूस दरवाढीसाठी केंद्रीय कृषीमंत्री व संबंधित यंत्रणांसोबत चर्चा करून ठोस निर्णय घेण्यात येईल, असे केंद्रीय मंत्र्यानी सांगितले. खाद्यतेलामध्ये पामतेल मिश्रित करण्यावर बंदी घालावी, सोयाबीन-कापसाचे धोरण ठरविण्यासाठी कायमस्वरूपी अभ्यासगट स्थापन करावा, वस्त्रोद्योगाला सॉफ्टलोन द्यावे आणि कांदा निर्यातबंदी मागे घ्यावी, अशा मागण्या तुपकरांनी केल्या.

आणखी वाचा-गोंदिया : पावसाने उसंत घेतल्याने धान मळणीला गती; मात्र, अवकाळी पावसामुळे….

ऊस उत्पादकांना वाचविण्यासाठी इथेनॉलबंदी उठविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. दूध उत्पादकांना ‘स्पेशल पॅकेज’ व दुध भूकटीला निर्यात अनुदान देण्याची मागणी तुपकरांनी केली असता अधिवेशनात निर्णय घेण्यात येईल असे फडणवीसांनी सांगितले.

आठवड्याची मुदत

बैठकीअंती माध्यमांशी बोलताना तुपकर यांनी नव्याने आंदोलनाचा इशारा दिला. या सर्व निर्णयांसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत दिली आहे. सरकारने निर्णय न घेतल्यास १५ डिसेंबरनंतर सोयाबीन-कापूस उत्पादकांचे आंदोलन पुन्हा पेटेल, असा इशाराही तुपकरांनी दिला आहे.