राज्याची अस्मिता व प्रेरणास्थान असलेल्या महापुरुषांबद्दल सत्ताधारी पक्षाचे नेते, पदाधिकारी यांनी अलीकडच्या काळात केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ आज शुक्रवारी मेहकर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला दणदणीत प्रतिसाद मिळाल्याचा दावा आघाडीच्या नेत्यांनी केला.

हेही वाचा>>>नागपूर: हिवाळी अधिवेशनात वि.प. सभापतीपदाची निवडणूक होणार की टळणार?

New demat account openings slow down
नवीन डिमॅट खाते उघडण्याचा वेग मंदावला
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Hemant Dhome Post About Rahul Solapurkar
Hemant Dhome : राहुल सोलापूरकरांच्या शिवरायांविषयीच्या वक्तव्याबाबत हेमंत ढोमेची पोस्ट, “स्वस्तातल्या इतिहासाचार्यांकडे सूज्ञांनी…”
concepts of logos dialectic socrates philosophy
तत्त्व-विवेक : पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातील ‘सॉक्रेटिक वळण’
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Statemet on Namdev Shashtri
Manoj Jarange : मनोज जरांगेंची नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर जोरदार टीका, “जातीयवादाचा नवा अंक…”
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
Santosh Juvekar
“डोळ्यात पाणी…”, ‘छावा’मधील राज्याभिषेकाच्या सीनबाबत संतोष जुवेकर म्हणाला, “विकी कौशलची एन्ट्री…”

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपचे काही नेते, पदाधिकाऱ्यांनी अलीकडच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील आदींबद्दल अपमानजनक विधान केल्याचा आरोप करीत मेहकर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. यामुळे तेथील दैनंदिन व्यवहार, उलाढाल ठप्प झाली. सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. बंद शांततेत पार पडला. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त असल्याने मुख्य चौक व मार्गांना पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

हेही वाचा>>>नागपूर: सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर ख्रिसमसला कोणता नवीन विक्रम करणार जाणून घ्या…

काँग्रेसचे श्याम उमाळकर, अनंत वानखेडे, विलास चनखोरे, पंकज हजारी, देवानंद पवार, वसंत देशमुख, ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख आशीष रहाटे, किशोर गारोळे, राष्ट्रवादीचे भास्कर काळे, आफताब खान, निसार अन्सारी, सागर परांडे, भीमशक्तीचे कैलास सुखदाने, तथागत ग्रुपचे संदीप गवई यासह समविचारी संघटनेचे पदाधिकारी यांनी गावातून फेरी काढली. यावेळी बंदचे आवाहन करून महामानवांचा जयजयकार करण्यात आला. या बंदला व्यापारी, व्यावसायिक, लघु व्यावसायिकांचा व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचा दावा ठाकरे गटाचे आशीष रहाटे यांनी लोकसत्तासोबत बोलताना केला.

Story img Loader