नागपूर : देशातील विविध महानगरांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये मानसिक आजाराचे प्रमाण अधिक असल्याचे इन्स्टिटय़ूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस, बंगळुरू या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे.

स्पर्धेच्या युगात कामाचा ताण, त्यातून उद्भवणारे आजार वाढले आहेत. विशेषत: युवावर्गात याचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने याची दखल घेत बंगळुरूच्या इन्स्टिटय़ूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस, या संस्थेच्या माध्यमातून विविध राज्यांमध्ये सर्वेक्षण केले. त्यात वरील बाब निदर्शनास आली. सर्वेक्षणानुसार, ३.५ टक्के लोकसंख्येला तणावाशी संबंधित विकाराने ग्रासले असून यात स्त्रियांचे प्रमाण पुरुषांच्या दुप्पट आहे.

Pune video
Video : पुण्यातील प्रत्येक महिलेनी पाहावा हा व्हिडीओ, महिला पोलीसाने सांगितले अडचणीच्या वेळी काय करावे?
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
Domestic women workers after struggling with life are set to board an airplane for the first time
“त्या” महिलांची ‘जिवाची मुंबई- श्रमाची आनंदवारी’
These Spices Every Woman Should Have In Her Daily Diet
महिलांनो कायम चिरतरूण राहायचंय? मग “हे” मसाले तुमच्या रोजच्या आहारात असायलाच हवे; डॉक्टरांनी दिली माहिती
husband and wife struggle wife also driving Truck heart touching video goes viral on social media
“हरलेला डावही जिंकता येतो फक्त साथीदार कट्टर पाहिजे” नवऱ्याच्या गरीबीत साथ देणाऱ्या ‘या’ बायकोचा VIDEO पाहून थक्क व्हाल
brain dementia signs
तुमच्या चालण्यातील ‘ही’ चार लक्षणं डिमेंशियाची सुरुवात असू शकतात? तज्ज्ञ काय सांगतात…
Hundreds of minor boys and girls commit suicide due to exams stress and love affairs
अल्पवयीन मुला-मुलींच्या शेकडो आत्महत्या, परीक्षा, तणाव, प्रेमसंबंध अन्…
Union Finance Minister Nirmala Sitharaman highlighted mental health in Economic Survey 2024 25 report
तरुणांचे मानसिक आरोग्य कशामुळे बिघडते ? काय म्हणतो आर्थिक सर्वेक्षण अहवाल

नैराश्याचे प्रमाण अधिक असलेल्या सरासरी ५० टक्के व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन कामात अडचणी येत आहेत. महानगरांमध्ये मानसिक विकृतीचे प्रमाण अधिक दिसून आले. १८ वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील सुमारे १०.६ टक्के नागरिकांमध्ये या आजाराचे प्रमाण गंभीर स्वरूपाचे आहे. मानसिक आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून विविध पावले उचलण्यात आली आहेत. देशातील ७१६ जिल्ह्यात मानसिक आरोग्य कार्यक्रम (एनएमएचपी) राबवण्यात येत आहे. शाळा, महाविद्यालयात मानसिक आजारग्रस्त विद्यार्थी आढळून आल्यास त्यांच्या उपचाराची सोय केली जाते. केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेतही मानसिक आजाराचा समावेश करण्यात आला आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘हेल्पलाईन’वर आतापर्यंत ६३,८०६ रुग्णांना समुपदेशन करण्यात आले आहे.

Story img Loader