लोकसत्ता टीम

नागपूर : जालनामध्ये घडलेली घटना दुर्देवी असली तरी या सगळ्या घटनेमागे कोण आहे याची मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असून लवकरच हे आंदोलन कोणी घडवून आणले आहे ते समोर येईल. त्यामुळे विरोधी पक्षाच्या या घटनेवर राजकारण न करता मराठा आरक्षण कसे देता येईल त्या दृष्टीने विचार केला पाहिजे असे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी व्यक्त केले.

Yogesh Kadam On Sanjay Shirsat :
Yogesh Kadam : शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली? “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत महत्त्व नाही”, योगेश कदमांचं विधान
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Chhagan Bhujbal
“तेलगी प्रकरणात माझं…”, दोन दशकानंतर भुजबळांनी मनातली खदखद व्यक्त केली; मंत्रिपदाच्या राजीनाम्याबद्दल म्हणाले…
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Chandrakant Patil on Dhananjay Munde
Chandrakant Patil: “… तर मुख्यमंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील”, चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”

धर्मरावबाबा आत्राम प्रसार माध्यमांशी बोलत होते. पक्ष मजबूत करण्यासाठी विदर्भात आम्ही मेळावा घेत आहोत. आगामी निवडणुकीत महायुती आणि राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे. अजित पवार सुद्धा विदर्भात लवकरच विभागीय पातळी मेळावे घेणार आहे. गणेश चतुर्थी, नवरात्र आदी सणासुदीचे दिवस असताना तेलामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत आहे. भेसळीचे प्रकार थांबले पाहिजे यासाठी कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहे. लवकरच कडक कारवाई करणार आहोत. नागपुरात या संदर्भात मोठ्या प्रमाणात भेसळ तयार त्त्याचा शोध घेतला जात आहे. सुगंधी तंबाखू असो की तेलात भेसळ असेल आम्ही अन्न प्रशासन विभागाच्या माध्यमातून कारवाई करणार आहे.

आणखी वाचा-“जालना लाठीचार्जसारख्या संवेदनशील मुद्याचे राजकारण करून….” चित्रा वाघ यांची महाविकास आघाडीवर टीका, म्हणाल्या…

शरद पवार सध्या प्रत्येक जिल्ह्यात सभा घेत आहे, माझ्या जिल्ह्यात आले तर त्यांचे स्वागत करू. त्यांचा आशीर्वाद राहणारच आहे, त्यांचे काम ते करतात, आमचे काम आम्ही करणार आहे. अजित पवार यांच्या मागे महायुतीची ताकद आम्ही उभे करणार आहे. विदर्भात दहा जागा असून कोणत्या जागा कोणाच्या वाट्याला येणार याबाबचा निर्णय महायुती घेईल मात्र उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्ष मजबूत व बळकट करणार असल्याचे आत्राम यांनी सांगितले.

Story img Loader