नागपूर : हल्ली वजन कमी करण्यासाठी समाज माध्यमांवर विविध व्यायाम व आहाराबाबत चुकीची माहिती फिरत असते. त्यातून अनेकांचे वजन झटपट कमी झाले आहे. परंतु त्यामुळे काहींच्या स्नायूला नुकसान झाले आहे. तर व्यायाम थांबल्यास या व्यक्तींचे वेगात वजन वाढते, असे निरक्षण देशातील नावाजलेल्या मधूमेह व लठ्ठपणा तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

नागपुरात डायबेटीस केअर फाउंडेशन ऑफ इंडियाची कार्यशाळा संपन्न झाली. त्यादरम्यान पत्रकारांशी संवाद साधतांना नवी दिल्लीतील मधुमेहतज्ज्ञ आणि रिसर्च सोसायटी फॉर द स्टडी ऑफ डायबेटीस इन इंडियाचे माजी अध्यक्ष डॉ. बी. एम. मक्कर म्हणाले, सध्या सोशल मीडियावरील ‘फॅड डाएट’कडे लोकांचा कल वाढत चालला आहे. परंतु झपाट्याने वजन कमी करण्याच्या नादात स्नायू गमावण्याचे (सार्कोपेनिया) प्रमाण वाढत आहे.

school principal misconduct with female teacher
महिला पालक, शिक्षिकांना अपरात्री फोन, अश्लील संभाषण, मुख्याध्यापकावर आरोप, काय आहे प्रकरण?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
appointments for deputy collector, tehsildar and education officer posts stalled candidates warn of protest at azad maidan from February 17
‘एमपीएससी’च्या शेकडो विद्यार्थ्यांचा मुंबईमध्ये आंदोलनाचा इशारा, सरकारच्या या धोरणा विरोधात…
Asha Bhosle Said This Thing About Eknath Shinde
Asha Bhosle : आशा भोसलेंनी केलं एकनाथ शिंदेंचं कौतुक, “बाळासाहेब ठाकरेंनी एकट्याने शिवसेना घडवली तशी…”
Chhagan Bhujbal On Pankaja Munde
Chhagan Bhujbal : “…तर वेगळा पक्ष उभा राहील”, पंकजा मुंडेंच्या विधानावर भुजबळांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “एका समाजावर पक्ष…”
Rahul Gandhi
Rahul Gandhi : मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना आवाहन; म्हणाले, “ताबडतोब…”
illegal passengers persist despite regular ticket checks with ticketless or irregular holders aboard trains
दंड वसुलीनंतरही अवैध प्रवाशांची संख्या कमी होईना
who is famous youtuber ranveer allahbadia aka beerbiceps
अंबानींच्या शाळेत शिक्षण, ७ युट्यूब चॅनेल्सचा मालक अन्…; आक्षेपार्ह वक्तव्यामुळे चर्चेत आलेला रणवीर अलाहाबादिया आहे तरी कोण?

‘फॅड डाएट्स’, ‘इंटरमिटंट फास्टिंग’ आणि एकाच प्रकारच्या व्यायामामुळे तातडीने वजन कमी होते. पण यात स्नायू आणि चरबी दोन्ही कमी होतात. मात्र, जेव्हा वजन पुन्हा वाढते, तेव्हा फक्त चरबी वाढते, गमावलेले स्नायू मात्र पुन्हा मिळवण्यासाठी योग्य व्यायाम व योग्य आहार गरजेचा असते. या व्यक्तीचे वेगात वजन वाढते. कालांतराने संबंधिताने वजन कमी करण्याचे प्रयत्न केल्यास त्याला बराच कालावधी लागतो. लठ्ठपणा हा एक आजार असून त्यामुळे उच्च रक्तदाब, मधूमेहासह बऱ्याच गंभीर आजारांचा धोका वाढत असल्योचही डॉ. मक्कर यांनी सांगितले. ज्येष्ठ मधुमेहतज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता म्हणाले, महिलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढले आहे. जन्माच्या वेळी बाळाचे वजन ३.५ किलोपेक्षा जास्त किंवा २.५ किलोपेक्षा कमी असेल, तर भविष्यात बाळाला लठ्ठपणाची जोखीम वाढते.

शास्त्रीय पद्धतीने वजन कमी करण्याची गरज- डॉ. नारवरिया

लठ्ठपणा तज्ज्ञानुसार, हळूहळू व शास्त्रीय पद्धतीने वजन कमी करायला हवे. प्रथम तीन महिन्यांत शरीराच्या एकूण वजनाच्या ५ टक्के वजन कमी व्हायला हवे. जर एखाद्याचे वजन १०० किलो असेल, तर पहिल्या ३ महिन्यांत ५ किलो, नंतरच्या ३ महिन्यांत ४.७५ किलो अशा टप्प्याटप्प्याने वजन कमी करायला हवे, अशी माहिती अहमदाबाद येथील बॅरियाट्रिक आणि रोबोटिक सर्जन डॉ. महेंद्र नारवरिया यांनी दिली. सोशल मीडियावर काही एकतर्फीं आहारपद्धती आणि फॅड डाएटसचे अतिप्रचार सुरू आहे. याला अनेक जण बळी पडून आपले वजन झपाट्याने कमी करतात. परंतु यामुळे शरीराच्या कार्यक्षमतेवर प्रभाव पडत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Story img Loader