वाशीम : ज्येष्ठ निरूपणकार श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासाठी खारघर येथे १६ एप्रिल रोजी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. परंतु, आयोजकांनी लोकांच्या जिवांची पर्वा न करता ढिसाळ नियोजन केले. यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे सदर प्रकरणी राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अमित झनक यांनी केले.

हेही वाचा – वाशीम: बिबट्याच्या बछड्यांचा क्षणभर विसावा

Prime Minister Narendra Modi Home Minister Amit Shah visit Thane district
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात भाजपची मोर्चेबांधणी सुरू; पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचा ठाणे जिल्हा दौरा
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
MP Rahul Shewale defamation case Uddhav Thackeray Sanjay Raut defamation case
खासदार राहुल शेवाळे यांच्या बदनामीचे प्रकरण: उद्धव ठाकरे, संजय राऊतांवर मानहानीचा खटला चालवणार
Jagan Mohan Reddy
नायडूंना खोटे बोलण्याची सवयच, जगन मोहन रेड्डी यांचे मोदींना पत्र; मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप
Shetkari Sangharsh Kruti Samiti, Dhananjay Munde,
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात सर्वपक्षीय ‘शेतकरी संघर्ष कृती समिती’ची मोट
Arvind Kejriwal resign today
केजरीवाल यांचा आज राजीनामा? राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली
shiv sena bjp conflict over regularizing construction built by project victims in navi mumbai and panvel
प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर नवी मुंबईत महायुतीतच धुसफुस ?
Controversial statement case High Court orders Thane Magistrate in case against Jitendra Awhad
वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण: जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा नोंदवण्याच्या मागणीचा पुनर्विचार करा,उच्च न्यायालयाचे ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांना आदेश

खारघर येथील सोहळ्याला देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी उपस्थित राहून केवळ शक्ती प्रदर्शन केले. परंतु, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्यांची कुठलीच व्यवस्था केली नाही. परिणामी उन्हामुळे जवळपास पन्नासपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे सरकारने उत्तर देण्यासाठी दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवावे आणि याप्रकरणी राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अमित झनक यांनी स्थानिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चक्रधर गोटे, सभापती वैभव सरनाईक, शहराध्यक्ष शंकर वानखेडे आदींची उपस्थिती होती.