अकोला : ‘नांदेड येथील रुग्णांच्या मृत्यू प्रकरणावरून टीका करण्याऐवजी तुमच्या काळात काय व्यवस्था होती? असा सवाल करीत राजकीय नव्हे तर व्यवहारिक मागणी करा, असा सल्ला बच्चू कडू यांनी विरोधकांना दिला आहे. सरकार कुठल्याही पक्षाचे असो पण देशाच्या ७५ वर्षांत आरोग्यासह मुलभूत सुविधा निर्माण करू शकलो नाही, याची लाज वाटली पाहिजे, अशी टीकाही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.

हेही वाचा >>> यवतमाळ: दोन युवकांना देशी कट्टे व जिवंत काडतुसांसह अटक

congress state president nana patole calls mahayuti government corrupt
महायुतीचे सरकार भ्रष्ट, तीन पक्षांत मलई खाण्याची स्पर्धा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा घणाघात
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Gandhi assassination Hindu Mahasabha Mangutiwar Narayan Apte Gwalior
‘गांधीहत्या’ म्हणताच काय आठवते?
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare
Bharatshet Gogawale : “एक दिवस तुमच्या सुसंस्कृतपणाचा पाढा…”, भरत गोगावलेंचा सुनील तटकरेंना थेट इशारा

अकोल्यात दिव्यांग मंत्रालयाच्या कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नांदेड येथील घटनेवरून त्यांना छेडले असता ते म्हणाले,‘आरोग्य व्यवस्था सुधारणे गरजेचे आहे. देशाचा अमृत महोत्सव साजरा केला गेला. ७५ वर्षांत शेतकरी, मजुरांना घरकुल मिळाले नाही. आरोग्य व शिक्षणाची सुविधा सक्षमपणे मिळाली नाही. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव मिळाला नाही. एकीकडे अमृत महोत्सव साजरा करीत असतांना दुसरीकडे सर्वसामान्यांना मुलभूत सुविधा मिळाल्या नाहीत. कुठल्याची पक्षाचे सरकार असो, याची लाज वाटली पाहिजे.’ काही जण मंत्र्यांचा राजीनामा मागत आहेत. त्यांच्या काळात काय व्यवस्था होती? असा प्रश्न आहे. राजकीय मागणी करू नये. व्यवहारिक मागणी करणे आवश्यक आहे. अर्थसंकल्पात आरोग्य सुविधेसाठी योग्य तरतूद करणे गरजेचे आहे, असे बच्चू कडू म्हणाले.

Story img Loader