राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणूक प्रचारात ‘जुनी पेन्शन योजना आमचेच सरकार देऊ शकते’, असे मतदारांना सांगितले होते. आता निवडणूक आटोपली आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपाचेच सरकार आहे. त्यामुळे जुनी पेन्शन योजना लागू करा, असे आवाहन आमदार सुधाकर अडबाले यांनी केले.

हेही वाचा- भंडारा: शंकरपटात बैलजोडी झाली सैराट, अन्…; जगत गुरुजींच्या बैलजोडीचा व्हिडिओ व्हायरल

पोटगीची रक्कम थकविल्याने पतीची कारागृहात रवानगी
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Image Of Ajit Pawa
“महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, हातात AK47 घेत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
controversial referee decision at maharashtra kesari event
अन्वयार्थ : कुस्तीच चितपट होऊ नये यासाठी…!
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Yogesh Kadam On Sanjay Shirsat :
Yogesh Kadam : शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली? “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत महत्त्व नाही”, योगेश कदमांचं विधान
What Narendra Modi Said?
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य, “नेहरू-इंदिरा गांधींपासून काँग्रेसच्या सरकारांमध्ये १२ लाखांवर ३ लाखांचा कर…”
What Pankaja Munde Said?
Pankaja Munde : पंकजा मुंडेंचं वक्तव्य; “राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं, काही लोक सुपारी…”

महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटना, नागपूर विभागतर्फे शनिवारी नवनिर्वाचित आमदार सुधाकर अडबाले यांचा सत्कार करण्यात आला होता. यावेळी अडबाले बोलत होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे सरचिटणीस विनोदजी दुर्गपुरोहित, सहसरचिटणीस शिवाजी ढुमणे, विभागीय अध्यक्ष अविनाश गभणे, सचिव डी.वाय. पाटील व निदेशक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा- वर्धा: हिंदी विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या आंदाेलनाने तणावपूर्ण वातावरण, पोलीस बंदोबस्तात वाढ; जाणून घ्या कारण…

अडबाले म्हणाले, विधान परिषद निवडणूक लागताच सर्व प्रथम महाराष्ट्र राज्य आयटीआय निर्देशक संघटनेने मला पाठिंबा दिला. त्याबद्दल सर्वांचे आभार. जुनी पेन्शन नाकारणाऱ्या भाजपाचा निवडणुकीत दारुण पराभव झाला. आता तरी सरकारने या मुद्यावर सकारात्मक विचार करावा. २००५ नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी, ही समस्त शिक्षक, राज्य कर्मचारी व आता जनसामान्यांची सुद्धा मागणी आहे. या मागणीसाठी आजवर रस्त्यावरची लढाई सुरू होती. आता सभागृहात लढा देऊ तसेच आयटीआय निर्देशकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न करू. संचालन मेहेरे यांनी तर आभार प्रेमानंद भैसारे यांनी मानले. यावेळी निदेशक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Story img Loader